शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

अतिक्रमणामुळे रस्ते झाकोळले

By admin | Updated: January 9, 2016 02:33 IST

वाढत्या नागरिकरणामुळे शहरात गजबज वाढली आहे. जागा मात्र तेवढीच असल्याने पर्याय म्हणून अनधिकृत अतिक्रमण होत आहे.

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : अतिक्रमण हटविण्याची मागणी वर्धा : वाढत्या नागरिकरणामुळे शहरात गजबज वाढली आहे. जागा मात्र तेवढीच असल्याने पर्याय म्हणून अनधिकृत अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे अनेक गल्लीबोळे खालून मोकळे असले तरी वरच्या बाजूने अतिक्रमणधारकांकडून झाकोळले गेले आहे. नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांचे रुपांतर चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ या काही वर्षात अतिशय गजबजून गेली आहे. दुकानांच्या रांगाच्या रांगा येथे पहावयास मिळतात. त्यामुळे वाहेने घेऊनच नाही तर काही रस्त्यांवर पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यातच अनेकांची जुनी घरे पाडली जाऊन तेथे आता पक्की काँक्रीटची घरे निर्माण होत आहे. या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या लहान रस्त्यांचा वापर आता प्रसाधनासाठी तसेच वाहने उभी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते दुर्लक्षित झाले आहे. नेमका याचाच फायदा घेत अनेक नागरिकांनी वरच्या बाजूने घरे रस्त्याच्या कडेला वाढवून अतिक्रमण केले आहे. वरवर पाहता हे अतिक्रमण लक्षात येत नसले तरी वर पाहिल्यावर मात्र रस्त्याच्या बाजूने वरून पुढे आलेली घरे एकमेकांना चिकटत असल्याचे दिसते. त्यामुळे कधीकळी वरूनही मोकळे असणारे रस्ते आता झाकोळले गेले आहेत. सतत गरिबांच्या अतिक्रमण काढत असलेल्या पालिका प्रशासनाला हे अतिक्रमण दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.(शहर प्रतिनिधी)