शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अतिक्रमणामुळे रस्ते झाकोळले

By admin | Updated: January 9, 2016 02:33 IST

वाढत्या नागरिकरणामुळे शहरात गजबज वाढली आहे. जागा मात्र तेवढीच असल्याने पर्याय म्हणून अनधिकृत अतिक्रमण होत आहे.

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : अतिक्रमण हटविण्याची मागणी वर्धा : वाढत्या नागरिकरणामुळे शहरात गजबज वाढली आहे. जागा मात्र तेवढीच असल्याने पर्याय म्हणून अनधिकृत अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे अनेक गल्लीबोळे खालून मोकळे असले तरी वरच्या बाजूने अतिक्रमणधारकांकडून झाकोळले गेले आहे. नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांचे रुपांतर चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ या काही वर्षात अतिशय गजबजून गेली आहे. दुकानांच्या रांगाच्या रांगा येथे पहावयास मिळतात. त्यामुळे वाहेने घेऊनच नाही तर काही रस्त्यांवर पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यातच अनेकांची जुनी घरे पाडली जाऊन तेथे आता पक्की काँक्रीटची घरे निर्माण होत आहे. या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या लहान रस्त्यांचा वापर आता प्रसाधनासाठी तसेच वाहने उभी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते दुर्लक्षित झाले आहे. नेमका याचाच फायदा घेत अनेक नागरिकांनी वरच्या बाजूने घरे रस्त्याच्या कडेला वाढवून अतिक्रमण केले आहे. वरवर पाहता हे अतिक्रमण लक्षात येत नसले तरी वर पाहिल्यावर मात्र रस्त्याच्या बाजूने वरून पुढे आलेली घरे एकमेकांना चिकटत असल्याचे दिसते. त्यामुळे कधीकळी वरूनही मोकळे असणारे रस्ते आता झाकोळले गेले आहेत. सतत गरिबांच्या अतिक्रमण काढत असलेल्या पालिका प्रशासनाला हे अतिक्रमण दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.(शहर प्रतिनिधी)