शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रितिका त्रिपाठीला सर्वाधिक सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:36 IST

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात रितिका त्रिपाठी हिने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त केले. यासह विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण ११८ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले.

ठळक मुद्दे२३ व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान : आयुर्विज्ञान शाखेतील ११८ विद्यार्थी गौरवान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात रितिका त्रिपाठी हिने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त केले. यासह विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण ११८ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २३ व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान केली तर १५ विद्यार्थ्यांना फेलोशीप आणि ५ विद्यार्थ्यांना मेडिकॉन युवा वैज्ञानिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुलपती दत्ता मेघे, राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्र-कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, अशोक चांडक, डॉ. बी.जे. सुभेदार, मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, डॉ. सतीश देवपुजारी, कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान, डॉ. मीनल चौधरी, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, रवी मेघे, भौतिकोपचार शाखेचे डॉ. अथरूद्दीन काझी, डॉ. सोहन सेलकर, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. व्ही. के. देशपांडे, डॉ. सुब्रत सामल, डॉ. प्रीती देसाई, डॉ. प्रज्ञा निखाडे, डॉ. आदर्शलता सिंग, डॉ. सुनीता श्रीवास्तव, परिचर्या शाखेच्या सीमा सिंग, वैशाली ताकसांडे, राजीव यशराय, डी.एस. कुंभारे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात डॉ. तन्मय गांधी यांनी सात सुवर्ण पदके, डॉ. हरमनदीपसिंग यांना चार सुवर्ण, वसुधा उमाटे हिला तीन सुवर्ण व एक रौप्य पदक आणि तीन रोख पुरस्कार, भेषना साहू व सत्यजित साहू यांना प्रत्येकी तीन सुवर्ण पदके व एक रोख पुरस्कार, आश्लेषा शुक्ला हिला तीन सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. या समारोहात वैद्यकीय शाखेतील २९८ व दंतविज्ञान शाखेतील १६० (पीएचडी, एमडी, एमएस, स्रातकोतर, स्नातक), आयुर्वेद शाखेतील ८५ परिचर्या शाखेतील १३७ तर परावैद्यकीय शाखेतील १९ विद्यार्थ्यांसह एकूण ७०० विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून आरोग्य सेवेची दीक्षा घेतली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नाझनी काझी आणि डॉ. श्वेता पिसूळकर यांनी केले. समारोहाची सुरूवात विद्यापीठगीताने झाली. डॉ. प्रियंका निरंजने यांनी पसायदान सादर केले. राष्ट्रगीताने दीक्षांत समारोहाची सांगता झाली. या कार्यक्रमाला आ. डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी आदी उपस्थित होते.