शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रितिका त्रिपाठीला सर्वाधिक सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:36 IST

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात रितिका त्रिपाठी हिने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त केले. यासह विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण ११८ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले.

ठळक मुद्दे२३ व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान : आयुर्विज्ञान शाखेतील ११८ विद्यार्थी गौरवान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात रितिका त्रिपाठी हिने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त केले. यासह विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण ११८ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २३ व्यक्तींना आचार्य पदवी प्रदान केली तर १५ विद्यार्थ्यांना फेलोशीप आणि ५ विद्यार्थ्यांना मेडिकॉन युवा वैज्ञानिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुलपती दत्ता मेघे, राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्र-कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, अशोक चांडक, डॉ. बी.जे. सुभेदार, मुख्य समन्वयक डॉ. एस.एस. पटेल, डॉ. सतीश देवपुजारी, कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक पखान, डॉ. मीनल चौधरी, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, रवी मेघे, भौतिकोपचार शाखेचे डॉ. अथरूद्दीन काझी, डॉ. सोहन सेलकर, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. व्ही. के. देशपांडे, डॉ. सुब्रत सामल, डॉ. प्रीती देसाई, डॉ. प्रज्ञा निखाडे, डॉ. आदर्शलता सिंग, डॉ. सुनीता श्रीवास्तव, परिचर्या शाखेच्या सीमा सिंग, वैशाली ताकसांडे, राजीव यशराय, डी.एस. कुंभारे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात डॉ. तन्मय गांधी यांनी सात सुवर्ण पदके, डॉ. हरमनदीपसिंग यांना चार सुवर्ण, वसुधा उमाटे हिला तीन सुवर्ण व एक रौप्य पदक आणि तीन रोख पुरस्कार, भेषना साहू व सत्यजित साहू यांना प्रत्येकी तीन सुवर्ण पदके व एक रोख पुरस्कार, आश्लेषा शुक्ला हिला तीन सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. या समारोहात वैद्यकीय शाखेतील २९८ व दंतविज्ञान शाखेतील १६० (पीएचडी, एमडी, एमएस, स्रातकोतर, स्नातक), आयुर्वेद शाखेतील ८५ परिचर्या शाखेतील १३७ तर परावैद्यकीय शाखेतील १९ विद्यार्थ्यांसह एकूण ७०० विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून आरोग्य सेवेची दीक्षा घेतली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नाझनी काझी आणि डॉ. श्वेता पिसूळकर यांनी केले. समारोहाची सुरूवात विद्यापीठगीताने झाली. डॉ. प्रियंका निरंजने यांनी पसायदान सादर केले. राष्ट्रगीताने दीक्षांत समारोहाची सांगता झाली. या कार्यक्रमाला आ. डॉ. पंकज भोयर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी आदी उपस्थित होते.