शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

प्लास्टिक पिशव्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका

By admin | Updated: June 28, 2014 00:37 IST

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढते प्रदुषण या विषयावर आपण सहजपणे चर्चा करीत असतो आणि मोठ-मोठ्या कंपन्याना दोष देत असतो, ...

वर्धा : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढते प्रदुषण या विषयावर आपण सहजपणे चर्चा करीत असतो आणि मोठ-मोठ्या कंपन्याना दोष देत असतो, परंतु आपण फेकलेल्या प्लास्टिकमुळे जनावरांचा जीव धोक्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. दिवसेंदिवस प्लास्टिक वस्तूचा वाढता वापर इतका जास्त आहे की माणसाच्या जीवनाला अविभाज्य घटक हा प्लास्टिक होवून बसले आह़ कार्यप्रसंगात जेवनात, पिण्याचे पाण्याचे ग्लास, प्लास्टिक वाट्या यांचा सर्रास वापर सुरू आहे़ याचे दुष्परिणाम काय याचे थोडेसेही ज्ञान सामान्यांना नाही. काही जणांना याचे ज्ञान असूनही याकडे ते दुर्लक्ष करीत आहे. केवळ सहज व स्वस्त उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आपले आकषण ठरत आहेत़ नदीनाद्यांद्वारे हा प्लास्टिक कचरा समुद्रात वाहत जाऊन आता समुद्रातही प्लास्टिकचा थर जमा व्हायला सुरूवात होत आहे़ जमिनीत न सडणारे प्लास्टिक जमिनीची जागा व्यापत असते. यापासून मानवाचा जीव कसा जाईल याची ज्वलंत उदाहरणे म्हणजे शहरात मोकाट फिरणारे जनावरे आहेत़ वर्धा शहरात नजिक असलेल्या पिपल फॉर अ‍ॅनिमल्स वर्धा द्वारा संचालित करूणाश्रम या आश्रमात शहरातील बेवारस जनावरांना आणण्यात येते. पोटात असलेल्या प्लास्टिकमुळे ही जनावरे दीर्घकाळ जगत नाहीत़ परिणामी मृत्यूनंतर २५ ते ३० किलो प्लास्टिक पिशव्या, गाईंच्या पोटातून निघतात. गो-मातची हिंदू धर्मीय आस्थेने पूजा करतात. पण याच गाई बॅचलर मार्गावर तसेच इतरही अनेक जागी जिथे कार्यालयातील अन्नपदार्थ आणि प्लास्टिक कचरा ताकल्या जातो तेथे अन्न खात असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिकच्या वस्तू अशा प्रकारे न फेकण्याचा निर्धार व्यक्त करने गरजेचे आहे. घरातल्या प्लास्टिक कॅरीबॅग व इतर कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास जनावरांचे प्राण वाचविणे शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज समाजातूनच व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)