शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

प्लास्टिक पिशव्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका

By admin | Updated: June 28, 2014 00:37 IST

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढते प्रदुषण या विषयावर आपण सहजपणे चर्चा करीत असतो आणि मोठ-मोठ्या कंपन्याना दोष देत असतो, ...

वर्धा : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढते प्रदुषण या विषयावर आपण सहजपणे चर्चा करीत असतो आणि मोठ-मोठ्या कंपन्याना दोष देत असतो, परंतु आपण फेकलेल्या प्लास्टिकमुळे जनावरांचा जीव धोक्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. दिवसेंदिवस प्लास्टिक वस्तूचा वाढता वापर इतका जास्त आहे की माणसाच्या जीवनाला अविभाज्य घटक हा प्लास्टिक होवून बसले आह़ कार्यप्रसंगात जेवनात, पिण्याचे पाण्याचे ग्लास, प्लास्टिक वाट्या यांचा सर्रास वापर सुरू आहे़ याचे दुष्परिणाम काय याचे थोडेसेही ज्ञान सामान्यांना नाही. काही जणांना याचे ज्ञान असूनही याकडे ते दुर्लक्ष करीत आहे. केवळ सहज व स्वस्त उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आपले आकषण ठरत आहेत़ नदीनाद्यांद्वारे हा प्लास्टिक कचरा समुद्रात वाहत जाऊन आता समुद्रातही प्लास्टिकचा थर जमा व्हायला सुरूवात होत आहे़ जमिनीत न सडणारे प्लास्टिक जमिनीची जागा व्यापत असते. यापासून मानवाचा जीव कसा जाईल याची ज्वलंत उदाहरणे म्हणजे शहरात मोकाट फिरणारे जनावरे आहेत़ वर्धा शहरात नजिक असलेल्या पिपल फॉर अ‍ॅनिमल्स वर्धा द्वारा संचालित करूणाश्रम या आश्रमात शहरातील बेवारस जनावरांना आणण्यात येते. पोटात असलेल्या प्लास्टिकमुळे ही जनावरे दीर्घकाळ जगत नाहीत़ परिणामी मृत्यूनंतर २५ ते ३० किलो प्लास्टिक पिशव्या, गाईंच्या पोटातून निघतात. गो-मातची हिंदू धर्मीय आस्थेने पूजा करतात. पण याच गाई बॅचलर मार्गावर तसेच इतरही अनेक जागी जिथे कार्यालयातील अन्नपदार्थ आणि प्लास्टिक कचरा ताकल्या जातो तेथे अन्न खात असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिकच्या वस्तू अशा प्रकारे न फेकण्याचा निर्धार व्यक्त करने गरजेचे आहे. घरातल्या प्लास्टिक कॅरीबॅग व इतर कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास जनावरांचे प्राण वाचविणे शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज समाजातूनच व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)