शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

प्लास्टिक पिशव्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका

By admin | Updated: June 28, 2014 00:37 IST

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढते प्रदुषण या विषयावर आपण सहजपणे चर्चा करीत असतो आणि मोठ-मोठ्या कंपन्याना दोष देत असतो, ...

वर्धा : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढते प्रदुषण या विषयावर आपण सहजपणे चर्चा करीत असतो आणि मोठ-मोठ्या कंपन्याना दोष देत असतो, परंतु आपण फेकलेल्या प्लास्टिकमुळे जनावरांचा जीव धोक्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. दिवसेंदिवस प्लास्टिक वस्तूचा वाढता वापर इतका जास्त आहे की माणसाच्या जीवनाला अविभाज्य घटक हा प्लास्टिक होवून बसले आह़ कार्यप्रसंगात जेवनात, पिण्याचे पाण्याचे ग्लास, प्लास्टिक वाट्या यांचा सर्रास वापर सुरू आहे़ याचे दुष्परिणाम काय याचे थोडेसेही ज्ञान सामान्यांना नाही. काही जणांना याचे ज्ञान असूनही याकडे ते दुर्लक्ष करीत आहे. केवळ सहज व स्वस्त उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आपले आकषण ठरत आहेत़ नदीनाद्यांद्वारे हा प्लास्टिक कचरा समुद्रात वाहत जाऊन आता समुद्रातही प्लास्टिकचा थर जमा व्हायला सुरूवात होत आहे़ जमिनीत न सडणारे प्लास्टिक जमिनीची जागा व्यापत असते. यापासून मानवाचा जीव कसा जाईल याची ज्वलंत उदाहरणे म्हणजे शहरात मोकाट फिरणारे जनावरे आहेत़ वर्धा शहरात नजिक असलेल्या पिपल फॉर अ‍ॅनिमल्स वर्धा द्वारा संचालित करूणाश्रम या आश्रमात शहरातील बेवारस जनावरांना आणण्यात येते. पोटात असलेल्या प्लास्टिकमुळे ही जनावरे दीर्घकाळ जगत नाहीत़ परिणामी मृत्यूनंतर २५ ते ३० किलो प्लास्टिक पिशव्या, गाईंच्या पोटातून निघतात. गो-मातची हिंदू धर्मीय आस्थेने पूजा करतात. पण याच गाई बॅचलर मार्गावर तसेच इतरही अनेक जागी जिथे कार्यालयातील अन्नपदार्थ आणि प्लास्टिक कचरा ताकल्या जातो तेथे अन्न खात असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिकच्या वस्तू अशा प्रकारे न फेकण्याचा निर्धार व्यक्त करने गरजेचे आहे. घरातल्या प्लास्टिक कॅरीबॅग व इतर कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास जनावरांचे प्राण वाचविणे शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज समाजातूनच व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)