शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

भारनियमनामुळे पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

By admin | Updated: October 29, 2014 22:54 IST

यंदा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे़ आता पिके बहरली असल्याने पाणी गरजेचे आहे; पण भारनियमन केले जात असल्याने ओलित करणेही कठीण झाले आहे़

वायगाव (नि़) : यंदा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे़ आता पिके बहरली असल्याने पाणी गरजेचे आहे; पण भारनियमन केले जात असल्याने ओलित करणेही कठीण झाले आहे़ महावितरणने याकडे लक्ष देत भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे़ सध्या कपाशीचे पीक चांगले बहरले आहे; पण पाणी नसल्याने कुरपत असल्याचे दिसते़ विहीर व पंप असलेले शेतकरी कपाशी तरी हाती यावी म्हणून ओलित करीत आहेत; पण महावितरणच्या भारनियमनाने शेतकऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडित होतो़ यामुळे शेतकऱ्यांना रात्रीही शेतात ओलित करावे लागत आहे़ रात्री भारनियमन केले जात असल्याने तेही शक्य होताना दिसत नाही़ यामुळे रात्र थोडी सोंगे फार प्रमाणे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात येरझारा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे़ वीज पुरवठा सुरू झाला की पुन्हा शेतात जाऊन पंप सुरू करणे, ओलित करणे आणि मधेच वीज खंडित झाली तर पुन्हा घरी परतणे, असा नित्यक्रम परिसरातील शेतकऱ्यांचा सुरू आहे़ रात्री शेतात ये-जा करावी लागत असल्याने वन्य प्राण्यांचा धोकाही निर्माण झाला आहे़ असे असले तरी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावेच लागत आहे़ याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करून रात्री भारनियमन करावे, अशी विनंती केली; पण उपयोग झाला नाही़ यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)