शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

प्लास्टिक निर्मूलनाबाबत कठोर

By admin | Updated: November 3, 2014 23:29 IST

फळभाजी विक्रेत्यांकडून दर दिवशी होणाऱ्या प्लॉस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने पुन्हा नव्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी

आर्वी पालिका ठोठावणार दंड : कारवाईच्या भीतीने दुकानदार धास्तावलेसुरेंद्र डाफ - आर्वीफळभाजी विक्रेत्यांकडून दर दिवशी होणाऱ्या प्लॉस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने पुन्हा नव्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. यात आर्वी नगर परिषदेने पाऊल उचलत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या थैल्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लस्टिक थैली वापरणाऱ्या दुकानदार, भाजी विक्रेते, फळविक्रेत्यावर कारवाई म्हणून १०० ते १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.आर्वीसह शहरातील तालुक्यातील सर्व किराणा दुकानदाराकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या सर्रासपणे वापरात येत आहे. त्याचा आरोग्यासह पर्यांवरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले. दर दिवशी या प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट कशी लावावी याची डोकेदुखी आर्वी पालिका प्रशासनासमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या वापरावर बंदी आणल्यावरच प्रतिबंध बसू शकतो, असे पालिकेच्या लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. आरोग्यावर व पर्यावरणावर विपरीत परिणाम करणाऱ्या या प्लास्टिकच्या थैल्यांवर शासनाने बंदी आदेश काढला; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र सर्वत्र आपल्याला दिसून येते. माहिती होऊनही कारवाई करण्यावर शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे अनेकवेळा समोर आले. दर आठवडी बाजारात ग्राहकांकडून वापरण्यात येणाऱ्या या प्लास्टिक पिशव्यांचे ढीग आर्वीत ठिकठिकाणी पाहायला मिळतात. तर नाल्यामध्ये त्या अडकून बसल्याने नाल्या तुंबतात. याची विल्हेवाट लावण्यासाठी कारवाई करण्याकरिता आर्वी पालिकेच्या या प्लास्टिक पिशव्यांचा खच गावाबाहेर सर्वत्र दिसून येतो. याच ढिगावर मोकाट जनावरे ताव मारत असतात. यात अनेक जनावरे प्लास्टिक खाऊन दगावल्याची उदाहरणे आहेत. आर्वी-वर्धा मार्गावर व आर्वी-पुलगाव मार्गावर या प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसून येत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना या अस्वच्छतेचे दर्शन घडते. त्याची विल्हेवाट बंदी घातल्यावरच लागू शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे. शासनाने या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालूनही त्याचा सर्वत्र वापर होतो; परंतु न.प. प्रशासन, अन्न व औषध खाद्य विभाग यांनी या वापरावर बंदी घालण्यास कारवाई गरजेची आहे. शासन अपयशी ठरत आहे; यामुळे आर्वी पालिकेने त्याची अंमलबजावणी करण्याचवा निर्णय घेतला आहे. नियमबाह्य रित्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.