शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक निर्मूलनाबाबत कठोर

By admin | Updated: November 3, 2014 23:29 IST

फळभाजी विक्रेत्यांकडून दर दिवशी होणाऱ्या प्लॉस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने पुन्हा नव्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी

आर्वी पालिका ठोठावणार दंड : कारवाईच्या भीतीने दुकानदार धास्तावलेसुरेंद्र डाफ - आर्वीफळभाजी विक्रेत्यांकडून दर दिवशी होणाऱ्या प्लॉस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने पुन्हा नव्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. यात आर्वी नगर परिषदेने पाऊल उचलत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या थैल्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लस्टिक थैली वापरणाऱ्या दुकानदार, भाजी विक्रेते, फळविक्रेत्यावर कारवाई म्हणून १०० ते १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.आर्वीसह शहरातील तालुक्यातील सर्व किराणा दुकानदाराकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या सर्रासपणे वापरात येत आहे. त्याचा आरोग्यासह पर्यांवरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले. दर दिवशी या प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट कशी लावावी याची डोकेदुखी आर्वी पालिका प्रशासनासमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या वापरावर बंदी आणल्यावरच प्रतिबंध बसू शकतो, असे पालिकेच्या लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. आरोग्यावर व पर्यावरणावर विपरीत परिणाम करणाऱ्या या प्लास्टिकच्या थैल्यांवर शासनाने बंदी आदेश काढला; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र सर्वत्र आपल्याला दिसून येते. माहिती होऊनही कारवाई करण्यावर शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे अनेकवेळा समोर आले. दर आठवडी बाजारात ग्राहकांकडून वापरण्यात येणाऱ्या या प्लास्टिक पिशव्यांचे ढीग आर्वीत ठिकठिकाणी पाहायला मिळतात. तर नाल्यामध्ये त्या अडकून बसल्याने नाल्या तुंबतात. याची विल्हेवाट लावण्यासाठी कारवाई करण्याकरिता आर्वी पालिकेच्या या प्लास्टिक पिशव्यांचा खच गावाबाहेर सर्वत्र दिसून येतो. याच ढिगावर मोकाट जनावरे ताव मारत असतात. यात अनेक जनावरे प्लास्टिक खाऊन दगावल्याची उदाहरणे आहेत. आर्वी-वर्धा मार्गावर व आर्वी-पुलगाव मार्गावर या प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसून येत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना या अस्वच्छतेचे दर्शन घडते. त्याची विल्हेवाट बंदी घातल्यावरच लागू शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे. शासनाने या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालूनही त्याचा सर्वत्र वापर होतो; परंतु न.प. प्रशासन, अन्न व औषध खाद्य विभाग यांनी या वापरावर बंदी घालण्यास कारवाई गरजेची आहे. शासन अपयशी ठरत आहे; यामुळे आर्वी पालिकेने त्याची अंमलबजावणी करण्याचवा निर्णय घेतला आहे. नियमबाह्य रित्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.