शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

७.६० लाख मतदार बजावतील मतदानाचा हक्क

By admin | Updated: February 16, 2017 01:16 IST

जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता उद्या गुरुवारी मतदान होत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता आज मतदान : १५० जागांकरिता ८१८ उमेदवार रिंगणात वर्धा : जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता उद्या गुरुवारी मतदान होत आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकीकरिता एकूण ८१८ उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषदेचे २८९ तर पंचायत समितीच्या ५२९ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांकरिता जिल्ह्यातील ७ लाख ६० हजार ४५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये ३ लाख ९५ हजार ५०६ पुरुष तर ३ लाख ६४ हजार ९६७ महिला व ११ इतर मतदारांचा समावेश आहे. निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडण्याकरिता जिल्हा प्रशासनाचीही व्यवस्था पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांकरिता असलेल्या या निवडणुकीकरिता एकूण ९६१ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रावर कारभार सांभाळण्याकरिता एकूण ४ हजार २२९ कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. यात १ हजार ५८ केंद्राध्यक्ष तर ३ हजार १७१ मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची मतदान केंद्रावर बुधवारीच रवानगी झाली आहे. मतदानाकरिता एकूण २ हजार ४३० इव्हीएमचा वापर होणार असून त्याही केंद्रावर पोहोचल्या आहेत. मतदान कार्याकरिता निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची निवड झालेल्या स्थळी पाठविण्याकरिता वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक तालुका स्तरावरून या कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले. वर्धेतील क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. उद्या होणाऱ्या मतदानात कुठलीही गडबड होणार नाही, याची पाहणी करण्याकरिता मुख्य निवडणूक निरीक्षक गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ चंद्रकांत पुलकुंडवार हे वर्धेत दाखल झाले होते. त्यांच्याकडे हिंगणघाट, समुद्रपूर आणि देवळी येथील काम पाहण्याची जबाबदारी आहे. तर कारंजा, आर्वी, आष्टी, सेलू या चार तालुक्यांसाठी भंडारा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदिपकुमार डांगे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्धा उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकार, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, समुद्रपूर तालुक्यात उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी, देवळीत उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, कारंजात भंडाराचे सहाय्यक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., आर्वीत उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, आष्टीत उपजिल्हाधिकारी स्वप्नील तांगडे, तर सेलू तालुक्याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांच्यावर आहेत.(प्रतिनिधी) इव्हीएमसह कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता एकूण ९६१ केंद्र आहेत. या केंद्रावर सर्व साहित्यानिशी कर्मचारी बुधवारी रवाना झाले. मतदानासाठी एकूण २ हजार ४३० ईव्हीएमची आवश्यकता आहे. त्यापैकी २ हजार २६ ईव्हीएम प्रत्यक्ष मतदान केंद्रावर लागणार असल्याची माहिती आहे. मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता कार्यकर्त्यांचीही फौज उमेदवाराचा प्रचार झाला, मतदानाचा दिवस आला. या दिवशी आपल्याला मतदान होईलच याची शाश्वती नाही. यामुळे अनेक उमेदवारांकडून मतदान काढण्याकरिता कार्यकर्त्यांना ताकीद देण्यात आली आहे. प्रत्येक भागाची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर सोपविली आहे. शिवाय मतदारांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी घेत मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती पुरविण्यात आली. यात काही उमेदवारांना यश आले तर काही अपयशी ठरले. यामुळे प्रत्येक भागातून मतदान काढण्याकरिता कार्यकर्ते तैनात झाले आहेत.