शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

जमीन अधिग्रहणाचे अधिकार हायवे अ‍ॅथॉरिटीला

By admin | Updated: September 12, 2016 00:56 IST

नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेबाबत कुठलाही कायदा किंवा अध्यादेश या पूर्वी शासनाने काढला नव्हता,

वर्धा : नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेबाबत कुठलाही कायदा किंवा अध्यादेश या पूर्वी शासनाने काढला नव्हता, भूसंपादन केवळ तोंडी आदेश देवून जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल यंत्रणा कामी लावलेली होती. पण शेतकऱ्यांचा या हायवेला होणारा विरोध लक्षात घेवून, सरकारने २२ आॅगस्टला महाराष्ट्र हायवे अ‍ॅक्टमध्ये दुरूस्तीच्या नावाखाली, हायवेसाठी व त्याच्या व त्याच्या बाजूच्या स्मार्ट सिटीसाठी शेतजमिनी घेण्याचे व त्याचे नोटीफीकेशन काढण्याचे अधिकार महाराष्ट्र हायवे आथर्टीला दिले. शासनाचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचेही गमे यावेळी म्हणाले. केवळ उद्योगपतींचे उखळ पांढरे करण्यासाठी नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेची निर्मिती करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे महात्मा फुले समता परिषदेने हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला आहे. जिल्हाधिकारी व महसूल यंत्रणेला दबाव टाकून शेतकऱ्यांकडून जबरीने धमक्या देवून तसेच सत्ताधारी राजकीय पक्षांच्या व उद्योगपतींच्या दलालांकडून, विविध आमिषे दाखवून, शेतकऱ्यांकडून, संमत्तीपत्रे घेण्याचे षडयंत्र सुरू आहे. म्हणजे पुढे हे सांगतील की, शेतकऱ्यांनी स्वच्छेने त्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पाकरिता दिलेल्या आहेत. ही फसवणूक असून त्यांचा शेतकऱ्यांच्यावतीने संघटीत पणे विरोध करणार असल्याचे मगे म्हणाले.(प्रतिनिधी)