शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

पिकांवर तांबेरा रोगाचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 01:59 IST

यावर्षी पावसाळ्याची सुरुवात वेळेवर झाली; परंतु त्यानंतर एक महिना पावसाने दडी मारली.

शेतकरी हवालदिल : उडीद, मूग, पिके पडली पिवळीसेलगाव (लवणे) : यावर्षी पावसाळ्याची सुरुवात वेळेवर झाली; परंतु त्यानंतर एक महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कशीबशी पिकांची वाढ झाली. सध्या परिस्थितीत पिके फुले व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानांच सोयाबीन, उडीद, मुग या पिकांवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.प्रारंभी हा रोग उडीद पिकांवरील पानांवर आढळला. उडीदावर पिवळे डाग पडायला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण पिकच पिवळे झाले. त्यानंतर याचाच परिणाम मुंग व मुख्य सोयाबीन पिकांवरही झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. कारण या तांबेरा रोगांमुळे पिकांना धरलेल्या शेंगातील दाणे अपरिपक्व राहतात व वजनाने हलके राहतात. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे दिसून येत आहे.गत तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करीत आहे. निसर्ग कधी अवकाळी पाऊस, गारपीट, कधी ओला दुष्काळ, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ अशा अनेक संकटाचा सामना करीत शेती करून उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांवर या रोगामुळे पुन्हा मागचे दिवस पुढे येणार तर नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जीवन जगणे कठीण होत आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.(वार्ताहर)