शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

उज्ज्वल प्रभाग संघाचा सीईओंकडून आढावा

By admin | Updated: September 19, 2016 00:52 IST

ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली आहे.

वर्धा : ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली आहे. जिल्हास्तरावर उमेद अभियानाच्या माध्यमातून गावस्तरावर विविध गटाची बांधणी करण्यात आली असून संघ तयार करण्यात आले आहेत. सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील अभियानाचा आढावा घेण्याकरिता जि.प. सीईओ नयना गुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सभा घेण्यात आली. उज्वल प्रभाग काम जाणून घेण्याकरिता उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती जाणून घेतली. सभेला जिल्हा व्यवस्थापक मनीष कावडे, सोनाली भोकरे, अमोलसिंग रोटोले, अमोल भागवत, प्रवीण भांडारकर, हिमानी राजपूत, अविनाश गोहाड, तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे, युसुफ शेख, कुंदा देवतळे, हेमंत काकडे, कल्पना खोबे यांची उपस्थिती होती. जिल्हास्तरावरून होणाऱ्या कामाची पाहणी तसेच येळाकेळी येथील उज्वल प्रभाग संघाचे गावात कार्यरत असलेले विविध समुदाय, संसाधन व्यक्ती यांची माहिती गुंडे यांनी घेतली. जिल्ह्यातील सेलू, देवळी, वर्धा तालुक्यामध्ये एकूण ५ हजार ६९३ गट, ३३६ ग्रामसेवा संघ, १७ प्रभाग संघ तयार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. प्रभाग संघाची व समुदाय संसाधन व्यक्ती यांची कार्यप्रणाली आर.विमला, नयना गुंडे यांना भेटीदरम्यान सांगण्यात आली. यावेळी महिलांसोबत मान्यवरांनी संवास साधला. गावातील ग्रामसंघ व प्रभाग संघातील महिलांनी उत्साहीपणे कामाची माहिती दिली. यामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती पे्ररिका, लेखापाल, पशुसखी, कृषीसखी, समुदाय पशुधन व्यवस्थापक, वर्धिनी, लघु उद्योग सल्लागार यांच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली. या उपक्रमात तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे, युसुफ शेख, कुंदा देवतळे, संघटिका कल्पना खोबे, ग्रामसचिव चव्हाण यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सोनू बारसागडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता प्रभाग संघाचे पदाधिकारी सरला भांडेकर, भारती चलाख, करलुके, लेखापाल वैशाली डोंगरे, प्रेरिका यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)