शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दिव्यांग कायद्यातील सुधारणेच्या प्रस्तावाचा ‘रिव्हर्स गिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 16:18 IST

मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा व औरंगाबादसह राज्यातील आणि देशातील इतर शहरांमधूनसुद्धा वैयक्तिक, सामूहिक व संघटनांच्या माध्यमातून अडीच हजारांपेक्षा अधिक हरकती नोंदविण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात कायद्यात सुधारणेच्या विरोधात हरकती येत असल्याचे पाहून अखेरीस हरकतीची मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव मागे घेतला आहे.

ठळक मुद्देहरकतींचा ओघ पाहून बदलला निर्णय अडीच हजारांपेक्षा अधिक हरकतींची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केेंद्र सरकारकडून दिव्यांग कायदा २०१६, यामध्ये तरतूद सुधारणा प्रस्तावित करण्यात आली होती. या प्रस्तावित सुधारणांमुळे कायदा कमकुवत होणार असल्याचा दावा करीत दिव्यांग संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला. मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा व औरंगाबादसह राज्यातील आणि देशातील इतर शहरांमधूनसुद्धा वैयक्तिक, सामूहिक व संघटनांच्या माध्यमातून अडीच हजारांपेक्षा अधिक हरकती नोंदविण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात कायद्यात सुधारणेच्या विरोधात हरकती येत असल्याचे पाहून अखेरीस हरकतीची मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कायद्यातील सुधारणेचा प्रस्ताव मागे घेतला आहे.

दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ मध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने पावले उचलली होती. यात दिव्यांगांच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता असल्याने राज्यातील दिव्यांग संघटना, अंध विद्यार्थी संघटना यासह दिव्यांगांच्या विकासासाठी लढा देणाऱ्या विविध संघटनांनी अधिनियमातील बदलाला एकजुटीने विरोध दर्शविला. समाजातून होणारा विरोध लक्षात घेता शासनालाही आपला प्रस्ताव सुधारणा न करताच मागे घ्यावा लागला. त्यामुळे ज्यांनी या कायद्याचा विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला, विरोध व निषेध करण्यात मोलाची भूमिका बजालवी, त्या प्रत्येक व्यक्तींचा हा विजय असल्याचे मत अंध विद्यार्थी संघटना, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हर्षद चक्रधरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Divyangदिव्यांग