शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
5
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
6
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
7
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
8
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
9
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
10
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
11
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
12
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
13
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
14
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
15
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
16
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
17
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
18
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
19
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
20
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...

महसूल देणारी गावेही रस्त्याविना

By admin | Updated: March 30, 2017 00:34 IST

जिल्हा प्रशासनाला महसूल देणाऱ्या गावांचा विकास प्राधान्याने करणे अपेक्षित असते; पण जिल्ह्यात नेमके उलट होत आहे.

वाघोली येथील प्रकार : स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष वर्धा : जिल्हा प्रशासनाला महसूल देणाऱ्या गावांचा विकास प्राधान्याने करणे अपेक्षित असते; पण जिल्ह्यात नेमके उलट होत आहे. रेती घाटांद्वारे महसूल मिळवून देणारी गावेच भकास होत असल्याचे दिसते. प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे. रेतीघाट असलेल्या गावांना सुविधा पुरविणे गरजेचे असताना त्या गावांना रस्त्यांपासूनही वंचित ठेवले जात असल्याचे दिसते. हा प्रकार आर्वी, आष्टी, हिंगणघाट आणि देवळी तालुक्यातील बहुतांश रेतीघाट असलेल्या गावांबाबत पाहावयास मिळतो. आष्टी तालुक्यातील गोदावरी गाव विकासापासून वंचित आहे. देवळी तालुक्यात वाघोली या गावात जाणाऱ्या रस्त्याला अवकळा आली आहे. गत कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. शिवाय याच मार्गावरील निमगव्हाण, बाभूळगाव आदी गावांतही समस्यांचा डोंगर आहे. महसूल देणारी गावे चकाचक करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे झाले आहे. धाटधारकांच्या साह्याने या गावांत विशेष विकास कामे राबविली जावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी) वाघोली, वडगाव, निमगव्हाण, गोदावरी गावांत समस्यांचा डोंगर महसूल देणाऱ्या गावांमध्ये विकास कामे करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेत गावातील विकास कामांचे प्रस्ताव जिल्हा दरबारी सादर करणे गरजेचे असते; पण असा प्रयत्नच होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, बहुतांश महसूल देणारी गावे विकासापासून वंचित असल्याचेच पाहावयास मिळते. गावात सिमेंटचे रस्ते; पण गावात जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय, अशी स्थिती आहे. परिणामी, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पुलगाव-दहेगाव रस्त्याचे काम संथगतीने बाभूळगाव, निमगव्हाण व वाघोली घाटातील रेती भरलेली अवजड वाहनांची पुलगाव-दहेगाव मार्गाने वाहतूक होते. शिवाय अन्य जड वाहतूकही सुरू असते. या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली होती. यामुळे पुलगाव ते वाघोलीपर्यंत रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे; पण ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, ये-जा करणाऱ्या ग्रामस्थ तथा अन्य वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.