शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

वडाळा घाटावर महसूलची धाड

By admin | Updated: April 17, 2017 00:37 IST

आर्वी तालुक्याच्या वडाळा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला आहे; पण ताबा मिळणे बाकी आहे.

दोन बोटी जप्त : ताबा मिळवण्यापूर्वीच वाळू खनन वर्धा : आर्वी तालुक्याच्या वडाळा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला आहे; पण ताबा मिळणे बाकी आहे. असे असताना घाटामध्ये रेती खननाकरिता बोटी आढळून आल्यात. सोरटा गावच्या पाणी पुरवठा योजनेतून गढूळ पाणी पुरवठा झाल्याने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांसह गावकऱ्यांनी पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती महसूल विभागाला देण्यात आल्यानंतर रविवारी दोन बोटी जप्त करण्यात आल्या. सोरटा येथे रविवारी पाणी पुरवठा योजनेतून गावकऱ्यांना गढूळ आणि डिझेलमिश्रीत पाणी आले. त्यामुळे गावकऱ्यांनी याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन निकम यांच्यासह उपसरपंच मंगेश मानकर, महेंद्र मानकर, मंगेश गवारले, प्रशांत सरोदकार, दत्तू कडू, दीपक देवगडे, आकाश मडवे, अमर आपुरकर, शुभम गावंडे, सुहास देवगडे, आधार भस्मे, सागर डफळे, हर्षद कडू, संतोष टाले, शिवकुमार पांडे, शंकर पांडे, अरवींद गेटमे, सचिन अलोणे आदींनी विहीर गाठून पाहणी केली. येथे वडाळा येथील वर्धा नदीच्या घाटात वाळू उत्खननाकरिता बोटींचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत गावकऱ्यांनी पुलगाव पोलिसांना माहिती दिली. सोबतच महसूल विभागालाही कळविण्यात आले. पोलीस पाहणी करून निघून गेले तर महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यांना घाट गाठून बोटींच्या जप्तीची कारवाई केली. अमरावती जिल्ह्याच्या आष्टा येथील वाळूघाटाचा लिलाव झाला आहे. वडाळा घाटाचा लिलाव असताना ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथून उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटींच्या वापराने नदीपात्रातील पाणी गढूळ तसेच दूषित होत आहे. तेच पाणी नागरिकांना पुरविल्या जात आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाहीची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी) पाण्याचा प्रवाहही रोखला वाळू उपस्याकरिता पाण्याचा प्रवाह अडविल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पाणी अडवून वाळूचे खनन सुरू आहे. त्यात बोट आणि डिझलचा वापर होत असल्याने नागरिकांना गढूळ पाणी वापरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घाटाचा ताबा मिळाला नसतानाही बोट, पोकलँडच्या साहाय्याने खनन सुरू आहे. याला कोणाची संमती असा नवचा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. एकीकडे वॉटर कप, दुसरीकडे वॉटर टब आर्वी तालुक्यात पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे मात्र उपलब्ध पाण्याचा टब (डबके) बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नदीच्या पात्रांमध्ये वाळू उपस्याकरिता सर्वच नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकाराला आळा घालण्याकरिता अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.