शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वडाळा घाटावर महसूलची धाड

By admin | Updated: April 17, 2017 00:37 IST

आर्वी तालुक्याच्या वडाळा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला आहे; पण ताबा मिळणे बाकी आहे.

दोन बोटी जप्त : ताबा मिळवण्यापूर्वीच वाळू खनन वर्धा : आर्वी तालुक्याच्या वडाळा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला आहे; पण ताबा मिळणे बाकी आहे. असे असताना घाटामध्ये रेती खननाकरिता बोटी आढळून आल्यात. सोरटा गावच्या पाणी पुरवठा योजनेतून गढूळ पाणी पुरवठा झाल्याने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांसह गावकऱ्यांनी पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती महसूल विभागाला देण्यात आल्यानंतर रविवारी दोन बोटी जप्त करण्यात आल्या. सोरटा येथे रविवारी पाणी पुरवठा योजनेतून गावकऱ्यांना गढूळ आणि डिझेलमिश्रीत पाणी आले. त्यामुळे गावकऱ्यांनी याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन निकम यांच्यासह उपसरपंच मंगेश मानकर, महेंद्र मानकर, मंगेश गवारले, प्रशांत सरोदकार, दत्तू कडू, दीपक देवगडे, आकाश मडवे, अमर आपुरकर, शुभम गावंडे, सुहास देवगडे, आधार भस्मे, सागर डफळे, हर्षद कडू, संतोष टाले, शिवकुमार पांडे, शंकर पांडे, अरवींद गेटमे, सचिन अलोणे आदींनी विहीर गाठून पाहणी केली. येथे वडाळा येथील वर्धा नदीच्या घाटात वाळू उत्खननाकरिता बोटींचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत गावकऱ्यांनी पुलगाव पोलिसांना माहिती दिली. सोबतच महसूल विभागालाही कळविण्यात आले. पोलीस पाहणी करून निघून गेले तर महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्यांना घाट गाठून बोटींच्या जप्तीची कारवाई केली. अमरावती जिल्ह्याच्या आष्टा येथील वाळूघाटाचा लिलाव झाला आहे. वडाळा घाटाचा लिलाव असताना ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथून उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोटींच्या वापराने नदीपात्रातील पाणी गढूळ तसेच दूषित होत आहे. तेच पाणी नागरिकांना पुरविल्या जात आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाहीची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी) पाण्याचा प्रवाहही रोखला वाळू उपस्याकरिता पाण्याचा प्रवाह अडविल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पाणी अडवून वाळूचे खनन सुरू आहे. त्यात बोट आणि डिझलचा वापर होत असल्याने नागरिकांना गढूळ पाणी वापरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घाटाचा ताबा मिळाला नसतानाही बोट, पोकलँडच्या साहाय्याने खनन सुरू आहे. याला कोणाची संमती असा नवचा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. एकीकडे वॉटर कप, दुसरीकडे वॉटर टब आर्वी तालुक्यात पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे मात्र उपलब्ध पाण्याचा टब (डबके) बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नदीच्या पात्रांमध्ये वाळू उपस्याकरिता सर्वच नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकाराला आळा घालण्याकरिता अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.