शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

दीड कोटींचा महसूल शासनजमा

By admin | Updated: October 20, 2016 00:32 IST

गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले शहरातील भूखंडांचे लीज नुतनीकरण प्रकरण अखेर मार्गी लागले.

लीज नुतनीकरण : ३०० वर प्रकरणे निकाली, अडीच हजार धारकांना नोटीसवर्धा : गत कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले शहरातील भूखंडांचे लीज नुतनीकरण प्रकरण अखेर मार्गी लागले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकाराने शहरातील सुमारे तीन हजारांवर नागरिकांना दिलासा मिळाला. गत सात महिन्यांच्या कालावधीत लीज नूतनीकरण प्रक्रियेतून सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल शासनजमा करण्यात आल्याची माहिती आहे. केवळ ३०० च्या वर प्रकरणांचा निपटारा होऊन हा महसूल गोळा झाला, हे विशेष!वर्धा शहरातील रामनगरसह काही भागातील भूखंड शासनाने नागरिकांना लीजवर दिलेले होते. यातील बहुतांश भूखंडांची लीज २००३ आणि त्यानंतर संपुष्टात आली. याबाबत शासनाकडून सात ते आठ अध्यादेश पारित करण्यात आले; पण भूखंडांच्या लीजचे नुतनीकरण होत नव्हते. परिणामी, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाकडे मोबदला भरूनही मालमत्ता आपल्या हक्काची होत नाही. तिची खरेदी-विक्री करता येत नाही, हे शल्य अनेकांना बोचत होते. मध्यंतरी ‘प्रॉपर्टी कार्ड’ तयार करून देत शासनाने लीज धारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतरही कुठलेच व्यवहार होत नव्हते. भूखंडांची लीज नूतनीकरण करण्यासाठी शासनाची परवानगी गरजेची होती. काही महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली आहे. सहा ते सात महिन्यांतच वर्धा जिल्ह्यातील सुमारे ३०० च्या वर प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणातून सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल शासनजमा करण्यात आला. शहरातील २ हजार ५०० भूखंड धारकांना नोटीस पाठविण्यात आले आहे. याद्वारे भूखंडांच्या लीजचे नुतनीकरण करून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेला शहरातील हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने मालमत्ता धारकांना दिलासा मिळाला आहे. लीज नुतनीकरणासाठी ओळखपत्रासह अर्ज, आखीव पत्रिका, नकाशा, जागेचा पट्टा, मूल्यांकन व खरेदी-विक्री झाली असल्यास पुरावा सादर लागणार आहे.(कार्यालय प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ आदेशाला बगलतत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत लीज नूतनीकरणाची प्रकरणे पूर्ण करावीत, असे निर्देश दिले होते; पण तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील यांनी यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. परिणामी, संपूर्ण प्रकरणे प्रलंबित राहिली होती. आता उपविभागीय अधिकारी पदी रूजू झालेल्या घनश्याम भूगावकर यांनी ही प्रकरणे त्वरेने निकाली काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. २०१५ च्या अध्यादेशाचा आधारउपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून २३ डिसेंबर २०१५ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचा आधार या लीजचे नूतनीकरण करण्यासाठी घेतला जात आहे. अत्यल्प भूईभाडे आकारून भूखंडांच्या लीजचे नूतनीकरण होत असल्याने मालमत्ता धारकांनीही पुढाकार घेतल्याचेच दिसून येत आहे. भूखंडांच्या लीजचे नुतनीकरण करण्याची प्रक्रिया रूजू झाल्यानंतर सुरू केली. सुमारे ३०० ते ४०० प्रकरणे निकाली काढली असून अडीच हजार मालमत्ता धारकांना नोटीस जारी करण्यात आले आहेत. यातून जवळपास सव्वा ते दीड कोटी रुपयांचा महसूल शासनजमा करण्यात आला. उर्वरित प्रकरणेही निकाली काढली जात असून नागरिकांचा पुढाकार गरजेचा आहे. - घनश्याम भूगावकर, उपविभागीय अधिकारी, वर्धा.