शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सेवानिवृत्त पोलिसांच्या समस्या निकाली निघणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:02 IST

महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या कार्यात निश्चितच चांगले यश मिळेल अशी मला खात्री आहे.

ठळक मुद्देचारूलता टोकस : निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

ऑनलाईन लोकमतवर्धा : महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या कार्यात निश्चितच चांगले यश मिळेल अशी मला खात्री आहे. पोलीस कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबियांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते त्याची आपणाला जाण आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली निघणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले.नागठाणा रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. व्यासपीठावर संघटनेचे राज्य अध्यक्ष धनंजय जाधव, रामभाऊ सातव, गंगाधर पाटील, खंडेराव शिंदे, रामराव पवार, प्रविर चक्रवर्ती, अ‍ॅड. न्यायनिर्गूणे, सुखानंद साब्दे, मदन चव्हाण, अशोक गोरे, रवींद्र कानफाडे, डी.बी. बढिये आदींची उपस्थिती होती. संघटनेचे राज्य महासचिव सुखानंद साब्दे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरीक सेवा महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्धा जिल्ह्यातील संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. याप्रसंगी प्रविर चक्रवर्ती व रामराव पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात राज्य संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी केली.कार्यक्रमादरम्यान वीरमाता शांता वरहारे यांनी आपला पूत्र देशसेवेसाठी दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागतगीत विकास काळे व माधुरी काळे यांनी सादर केले. प्रास्ताविक वर्धा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पाटील यांनी केले. पहिल्या सत्राचे आभार संघटनेचे कार्याध्यक्ष, अंकुश पिंपरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माधुरी काळे व हेमा शिंदे यांनी केले. अधिवेशनाला वैकुंठ उईके, प्रल्हाद गिरपुंजे, तिडके, केशव खरडे, रमेश खेडकर, अंगद उईके, वसंत गायकवाड, मु. अ. खान, ज्ञानेश्वर वैद्य, अमृत मडावी, वासुदेव वरहारे, नरेंद्र व्यवहारे, विजय खोब्रागडे, मोरेश्वर तेलरांधे, मनोहर पोटदुखे, रमेश गुरनुले, दिलीप भागवतकर, वासुदेव बोंदरे आदींची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.न्यायनिर्गुणे यांनी मांडला ठरावअधिवेशनादरम्यान अ‍ॅड. न्यायनिर्गुणे यांनी घटनेच्या संदर्भात ठराव मांडला. त्याला सर्वसंमतीने याप्रसंगी मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अशोक गोरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात संघटनेकरिता शासनाचे महसूल विभागाने कार्यालय व इतर बाबींकरिता भु-खंड उपलब्ध करून द्यावा व त्यात पोलीस गृहनिर्माण मंडळाने सहकार्य करावे असा ठराव मांडला. त्यालाही यावेळी मंजूरी मिळाली. कार्यरत पोलीस कर्मचाºयांचा ताण कमी व्हावा म्हणून कर्तव्याचा काळ आठ तासाचा करावा, असा ठरावही यावेळी घेण्यात आला.