शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रसुलाबादवर कृत्रिम जलसंकटाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:23 IST

ऑनलाईन लोकमतवर्धा : आर्वी तालुक्यातील रसुलाबाद हे गाव कष्टकºयांचे अन् मातब्बर राजकीय पुढाºयांचे; पण सध्या येथील राजकीय पुढाऱ्यांसह काही शासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या गावातील नागरिकांना कृत्रिम जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गत काही दिवसांपासून रसुलाबाद येथील पाणी पुरवठा योजनेचे बंद पडलेले काम. ...

ठळक मुद्देवरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी : पाणी पुरवठा योजनेचे काम कासवगतीने

ऑनलाईन लोकमतवर्धा : आर्वी तालुक्यातील रसुलाबाद हे गाव कष्टकºयांचे अन् मातब्बर राजकीय पुढाºयांचे; पण सध्या येथील राजकीय पुढाऱ्यांसह काही शासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या गावातील नागरिकांना कृत्रिम जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गत काही दिवसांपासून रसुलाबाद येथील पाणी पुरवठा योजनेचे बंद पडलेले काम. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.रसुलाबाद येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने सुमारे १ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या विकास कामादरम्यान ५० हजार लिटर क्षमतेचा एक जलकुंभ, बारा (सोनेगाव) शिवारात एक विहीर, पाणी पुरवठ्याच्या विहिरीपासून ते जलकुंभ पर्यंतची सुमारे साडे तीन कि.मी.ची जलवाहिनी तसेच गावात सुमारे सात हजार मिटरची जलवाहिनी आदी कामे करण्यात येणार आहे.सदर विकास कामाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून दिल्यानंतर कामाचा कंत्राट देण्यासाठी निविदा बोलविण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन हा कंत्राट अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील शहाने नामक कंत्राटदाराला देण्यात आला आहे. या कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामालाही सुरूवात केली. मात्र, अवघ्या काही दिवसातच काम बंद पडल्याने ग्रामपंचायत प्रशासनासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे विकास काम युद्धपातळीवर पूर्ण झाल्यास गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नसल्याने बंद पडलेले पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. शिवाय हे काम तात्काळ सुरू न झाल्यास प्रहार रस्त्यावर उतरेल असा इशारा आर्वीच्या गटविकास अधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.थंडबस्त्यातील कामाला गती द्या - पं.स. सदस्यरसुलाबाद येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे विकास काम गत काही दिवसांपासून बंद आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने हे काम युद्धपातळीवर सुरू होणे गरजेचे आहे. संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन हे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आर्वीच्या गट विकास अधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून पंं.स. सदस्य अरुणा सावरकर यांनी केली आहे.पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले आहे. गारपीट झाल्याने कंत्राटदाराने काही दिवसांसाठी काम थांबविले होते. विहीर खोदकामासाठी लागणारे पाटबंधारे विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र ग्रा.पं.ला प्राप्त झाले आहे. लवकरच थांबलेले काम सुरू होईल.- राजश्री धारगावे, सरपंच, रसुलाबाद.विहिरीला पाणी भरपूर आहे. काही उपकरणे लावली;पण पाणी कमी होण्याचे नाव घेईना. तेथे विद्युत जोडणीची गरज असून विद्युत जोडणी अभावी काम थांबले. नुकताच आपण जास्त व्हॅटचा डायनोमा खरेदी केला आहे. त्याच्या सहाय्याने विद्युत निर्मिती करून विहिरीतील पाणी कमी करीत काम सुरू करू. मंगळवारपासून काम सुरू होईल.- अशोक शहाने, कंत्राटदार.कंत्राटदाराकडे अपुरी उपकरणेरसुलाबाद येथील पाणी पुरवठा योजनेचे काम करताना कंत्राटदाराने सुरूवातीला विहीर खोदण्याच्या कामाला प्राधान्य दिले. ज्या ठिकाणी विहीर खोदल्या जात आहे त्यासाठी आवश्यक असणारे पाटबंधारे विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अद्यापही रसुलाबाद ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.इतकेच नव्हे तर अर्धवट खोलकाम झालेल्या विहिरीला जलाजम पाणी लागले. परंतु, पाहिजे तशी उपकरणे नसल्याने सध्या काम बंद असल्याचे व लवकरच काम सुरू होणार असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.विद्युत जोडणीसाठी अडलयं घोडंज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे खोदकाम सुरू आहे तेथे खोदकामादरम्यान मुबलक पाणी लागले. कंत्राटदाराने सुरूवातीला त्याच्याकडे असलेल्या उपकरणांच्या सहाय्याने विहिरीतील जल पातळी करून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला;पण त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आल्याने रसुलाबादच्या सरपंचासह ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहीती देण्यात आली.सदर प्रकरणी दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने महावितरणला पत्र लिहीत विहिरीच्या परिसरात कंत्राटदाराला विद्युत जोडणी देण्याची विनंती केली. परंतु, अद्यापही विद्युत जोडणी देण्यात आली नसल्याचे सरपंच राजश्री धारगावे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी