शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

३६ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावर पूर्ववत करा

By admin | Updated: May 23, 2015 02:26 IST

सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना १ मे २०१५ पूर्वी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले होते.

वर्धा : सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना १ मे २०१५ पूर्वी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले होते. रुग्णालय व परिसरात हे कर्मचारी १५ ते २० वर्षांपासून कार्यरत होते. कामावरुन कमी करताना व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यांना १ मे पासून अटेन्डन या पदावर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २० दिवसांचा कालावधी उलटुनही अद्याप कामावर पूर्ववत केले नाही. केवळ पाच कर्मचाऱ्यांना रुजु करुन घेतले. यामुळे ३६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून कामावर पूर्ववत करण्याची मागणी आहे.याबाबत कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, खा. रामदास तडस, तहसीलदार वर्धा यांना देण्यात आली आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करताना पूर्ववत करण्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. याकरिता कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अहर्तेचे कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रे मागितले होते. त्यानुसार व्यवस्थापनाकडे कागदपत्र सादर करण्यात आले. त्यानंतर कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. यात अटेन्डन या पदाकरिता काम करण्यास तयार आहात काय, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला सदर पदावर काम करण्यासाठी होकार दिला होता. यानंतर व्यवस्थापनाने १ मे २०१५ पासून अटेन्डन या पदावर बाय आॅर्डर रूजू करून घेण्याचे आश्वासन दिले होते. याला २० दिवसांचा कालावधी लोटला. पण अजूनही कामावर पूर्ववत करण्यात आले नाही. यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)