शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

३६ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावर पूर्ववत करा

By admin | Updated: May 23, 2015 02:26 IST

सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना १ मे २०१५ पूर्वी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले होते.

वर्धा : सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना १ मे २०१५ पूर्वी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले होते. रुग्णालय व परिसरात हे कर्मचारी १५ ते २० वर्षांपासून कार्यरत होते. कामावरुन कमी करताना व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यांना १ मे पासून अटेन्डन या पदावर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २० दिवसांचा कालावधी उलटुनही अद्याप कामावर पूर्ववत केले नाही. केवळ पाच कर्मचाऱ्यांना रुजु करुन घेतले. यामुळे ३६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून कामावर पूर्ववत करण्याची मागणी आहे.याबाबत कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, खा. रामदास तडस, तहसीलदार वर्धा यांना देण्यात आली आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करताना पूर्ववत करण्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. याकरिता कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अहर्तेचे कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रे मागितले होते. त्यानुसार व्यवस्थापनाकडे कागदपत्र सादर करण्यात आले. त्यानंतर कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. यात अटेन्डन या पदाकरिता काम करण्यास तयार आहात काय, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला सदर पदावर काम करण्यासाठी होकार दिला होता. यानंतर व्यवस्थापनाने १ मे २०१५ पासून अटेन्डन या पदावर बाय आॅर्डर रूजू करून घेण्याचे आश्वासन दिले होते. याला २० दिवसांचा कालावधी लोटला. पण अजूनही कामावर पूर्ववत करण्यात आले नाही. यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)