शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अल्प मनुष्यबळ सांभाळतेय जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील १५ लाख ७८ हजार ६२० नागरिकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदांवर आहेत. नागरिकांना वेळीच उत्तम सुविधा मिळण्याकरिता आरोग्य यंत्रणाही सुसज्ज असणे गरजेचे आहेत. पण, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील तब्बल ३१ टक्के पदे रिक्त असल्याने तोकड्या मनुष्यबळावरच आरोग्याचा डोलारा सांभाळावा लागत आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे यंत्रणेवर आलाय ताण : जिल्हा आरोग्य यंत्रणेतील ३१ टक्के जागा रिक्तच

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाकाळात आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या आरोग्य विभागाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार रिक्तपदाच्या भरणा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही त्याला मंजुरी मिळत नसल्याने आता आरोग्याचा डोलारा सांभाळताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ऑक्सिजन मिळेल, व्हेंटिलेटरचीही व्यवस्था होईल पण, लागणारे मनुष्यबळ आणणार कु ठून असा प्रश्न आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यातील अल्प मनुष्यबळच दीड वर्षापासून आरोग्याची जबाबदारी भक्कमपणे सांभाळत आहे. पण, अखेर तेही मनुष्यच असल्याने त्यांचीही सहनशक्ती संपायला लागली आहे.जिल्ह्यातील १५ लाख ७८ हजार ६२० नागरिकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदांवर आहेत. नागरिकांना वेळीच उत्तम सुविधा मिळण्याकरिता आरोग्य यंत्रणाही सुसज्ज असणे गरजेचे आहेत. पण, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील तब्बल ३१ टक्के पदे रिक्त असल्याने तोकड्या मनुष्यबळावरच आरोग्याचा डोलारा सांभाळावा लागत आहे. जिल्ह्याला सावंगी आणि सेवाग्राम येथील दोन रुग्णालयाचा आधार असल्याने आतापर्यंत आरोग्य यंत्रणा सदृढ होती. पण, या कोरोनाच्या दुसऱ्या लाटीत आरोग्य यंत्रणा खालावलेली दिसून येत आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गावापासून तर शहरापर्यंत आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटत आहे. पण, मोठ्या लोकसंख्येपुढे ही तोकडी आरोग्य यंत्रणा आता कमी पडत आहे. कोरोनासोबत इतरही आजारावर नियंत्रण मिळवायचे असल्याने गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी घायकुतीस आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागातील पदे भरली नसल्याने आता आरोग्यबाबत हयगय होत आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबत कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा दम देणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही यासाठी कधी पुढाकार घेतलेला दिसला नाही. या महामारीतून अनुभव घेत आधी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याची गरज व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागातील बहूसंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे या कोरोनाकाळात यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. तरीही रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, याकरिता आहे त्या मनुष्यबळाच्या आधारे अहोरात्र आरोग्य सेवा दिली जात आहे. रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आले पण, पदे भरली नाही. परिणामी आता कोणत्याही रजा न घेता काम करावे लागत आहे.डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने रिक्तपदे भरण्याकरिता वारंवार निवेदनातून शासन व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. परंतु अनेक वर्ष मंजूर पदाची जिल्हा प्रशासनाकडून बिंदूनामावली करण्यात आली नाही. तसेच २२११ लेखाशिर्ष अंतर्गत पदाचा घोळ सुटलेला नाही.दिलीप उटाणे, राज्य कार्याध्यक्ष,   जि.प.आराेग्य सेवा कर्मचारी संघटना, वर्धा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या