शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प

By admin | Updated: January 31, 2016 02:20 IST

गाव आत्मनिर्भर करण्याचे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकारण्यासाठी गावांचा विकास करताना प्रत्येक गाव पाण्यासाठी ...

जल परिषद : विविध तज्ज्ञांमार्फत जिल्ह्यातील भुजल साठ्यांवर सादरीकरणवर्धा : गाव आत्मनिर्भर करण्याचे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकारण्यासाठी गावांचा विकास करताना प्रत्येक गाव पाण्यासाठी आत्मनिर्भर करून वर्धा जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प जल परिषदेच्या निमित्ताने करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील पाच सरपंचांनी एक वर्षाचे मानधन जलयुक्त शिवार अभियानासाठी दिल्याचे यावेळी जाहीर केले.खा. रामदास तडस यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना आता प्रत्येक गावात राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली. माजी खासदार दत्ता मेघे यांनी जलयुक्त शिवार प्रभावीपणे राबवित असताना सरपंच व ग्रामस्थांनी जलसंधारणासाठीर प्रत्यक्ष कृतीतून आपले गाव जलयुक्त करावे, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी प्रास्ताविकातून जलसाक्षरतेची चळवळ सुरू करण्यासाठी सरपंच व सर्व लोकप्रतिनिधींसाठी जलपरिषद असल्याचे सांगितले. माथा ते पायथा यानुसार जलयुक्त शिवार अभियानात २१० गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंधारणाची कामे घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.प्रादेशिक उपसंचालक आय. आय. शाह यांनी भूजल सर्वेक्षणानुसार वर्धा जिल्ह्यातील भूजल स्थिती व करावयाच्या उपाययोजना, जलयुक्त शिवार यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, पाण्याचा ताळेबंद या विषयावर डॉ. महेंद्र नागदिवे, भूजल मुल्यांकन तथा जलसंधारण याविषयावर जलतज्ञ मनोहर सोमनाथे, पावसाच्या पाण्याचे संवर्धन या विषयांवर माधव कोटस्थाने, वर्धा जिल्ह्याची भविष्यातील वाटचाल या विषयावर मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, २४ बाय ७ ग्रामीण पाणी पुरवठा मौजा उमरीचे उपसरपंच सचिन खोसे, अतिशोषित पाणलोटातील जलसंधारण या विषयावर के.के. मराठे आदींनी सादरीकरणातून प्रकाश टाकला. जलपरिषदेचे संचालन सचिन घोडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, सर्व सदस्य, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व जलतज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी जलयुक्त वर्धा प्रदर्शनाला भेट दिली.(जिल्हा प्रतिनिधी)