शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प

By admin | Updated: January 31, 2016 02:20 IST

गाव आत्मनिर्भर करण्याचे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकारण्यासाठी गावांचा विकास करताना प्रत्येक गाव पाण्यासाठी ...

जल परिषद : विविध तज्ज्ञांमार्फत जिल्ह्यातील भुजल साठ्यांवर सादरीकरणवर्धा : गाव आत्मनिर्भर करण्याचे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकारण्यासाठी गावांचा विकास करताना प्रत्येक गाव पाण्यासाठी आत्मनिर्भर करून वर्धा जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प जल परिषदेच्या निमित्ताने करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील पाच सरपंचांनी एक वर्षाचे मानधन जलयुक्त शिवार अभियानासाठी दिल्याचे यावेळी जाहीर केले.खा. रामदास तडस यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना आता प्रत्येक गावात राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली. माजी खासदार दत्ता मेघे यांनी जलयुक्त शिवार प्रभावीपणे राबवित असताना सरपंच व ग्रामस्थांनी जलसंधारणासाठीर प्रत्यक्ष कृतीतून आपले गाव जलयुक्त करावे, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी प्रास्ताविकातून जलसाक्षरतेची चळवळ सुरू करण्यासाठी सरपंच व सर्व लोकप्रतिनिधींसाठी जलपरिषद असल्याचे सांगितले. माथा ते पायथा यानुसार जलयुक्त शिवार अभियानात २१० गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंधारणाची कामे घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.प्रादेशिक उपसंचालक आय. आय. शाह यांनी भूजल सर्वेक्षणानुसार वर्धा जिल्ह्यातील भूजल स्थिती व करावयाच्या उपाययोजना, जलयुक्त शिवार यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, पाण्याचा ताळेबंद या विषयावर डॉ. महेंद्र नागदिवे, भूजल मुल्यांकन तथा जलसंधारण याविषयावर जलतज्ञ मनोहर सोमनाथे, पावसाच्या पाण्याचे संवर्धन या विषयांवर माधव कोटस्थाने, वर्धा जिल्ह्याची भविष्यातील वाटचाल या विषयावर मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, २४ बाय ७ ग्रामीण पाणी पुरवठा मौजा उमरीचे उपसरपंच सचिन खोसे, अतिशोषित पाणलोटातील जलसंधारण या विषयावर के.के. मराठे आदींनी सादरीकरणातून प्रकाश टाकला. जलपरिषदेचे संचालन सचिन घोडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, सर्व सदस्य, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व जलतज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी जलयुक्त वर्धा प्रदर्शनाला भेट दिली.(जिल्हा प्रतिनिधी)