शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वेतन रखडल्याने शिक्षकांत असंतोष

By admin | Updated: July 13, 2017 00:57 IST

स्थानिक पंचायत समितीचा शिक्षण विभाग या-ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेत असतो.

आंदोलनाचा इशारा : वरिष्ठांनी दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : स्थानिक पंचायत समितीचा शिक्षण विभाग या-ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेत असतो. पं.स. अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे वेतन पुन्हा एकदा रखडले आहे. यामुळे हा विभाग चर्चेचा विषय ठरत आहे. अडलेले वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी संतप्त शिक्षकांनी केली आहे. याबाबत सहायक गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. पं.स. मध्ये वेतन काढण्याची जबाबदारी असलेल्या लिपिकाच्या गलथान कारभारामुळे मागील काही महिन्यांपासून शिक्षक त्रस्त आहेत. सदर लिपिक बहुदा शिक्षकांशी अरेरावी करीत असल्याचा तथा शासकीय नियमांना फाटा देत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. कार्यालय प्रमुख असलेले अधीक्षक हे देखील त्याच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधीक्षक देखील विविध कारणे देत कार्यालयाबाहेर राहत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे शिक्षकांचे दैनंदिन व्यवहार प्रभावित होत आहेत. जून महिन्याच्या वेतनाचे विगतवारी व वित्तप्रेषण येथील पंचायत समितीला ७ जुलै रोजी पोहोचता झाले; पण लिपिकाने अद्यापही वेतन देयके तयार केले नाहीत. वेतन का झाले नाही, याची विचारणा शिक्षक संघटनेच्या काही प्रतिनिधींनी केली असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. मागील आठ दिवसांपासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आले नाहीत. यामुळे स्वाक्षऱ्या झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. कधी गटविकास अधिकारी धनादेश अडवून ठेवत असल्याचे सांगितले जाते तर कधी अन्य कारणे पूढे केली जात असल्याचा आरोपही शिक्षक करीत आहेत. समूद्रपूर पं.स. मधील अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक शिक्षकांचे वेतन अडवित असून रखडलेले वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या व सहाव्या वेतन आयोगाच्या हप्त्यांचे प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. संबंधित लिपिकांची अनास्था याला कारणीभूत ठरत आहे. जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत पावले उचलावित, अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिक्षक तथा संघटनांनी केली आहे. मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.