शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

नदीवरील पुलाची दुरूस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:49 IST

तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : पुलाअभावी आवागमनाचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नमवारग्राम : तलावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नदीवर पूल आहे. पावसामुळे सदर पुलाच्या दोन्ही बाजू तथा मध्यभाग वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलिकडे असलेल्या जऊरखेडा शिवारातील सुमारे ६०-७० शेतकºयांचे पीक शेतातच अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याकडे लक्ष देत पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.सदर रस्त्याची तलाव बनविला तेव्हा मध्यम पाटबंधारे विभागाद्वारे तयार करण्यात आला होता. सोबतच नदीवर पाईपच्या पुलाची निर्मितीही कण्यात आली होती. या पुलावरून शेतकºयांना शेतमालाची ने-आण करणे सोयीचे झाले होते. तलावाकडे वाहनांनी ये-जा करता येत होती. १०-१२ वर्षांपूर्वीही हा पूल असाच वाहून गेला होता. तेव्हा पाटबंधारे विभागाकडून कंत्राटदारामार्फत दुरूस्ती करून घेण्यात आली होती. आता पुन्हा हा पूल असाच वाहून गेल्याने तलावावर वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेल्या शेतकºयांना सोयाबीन व अन्य शेतमाल घरी आणणे तथा विक्रीस नेणेही कठीण झाले आहे.रबी हंगामात गहू, चना पिकासाठी शेत तयार करावे लागणार आहे. नदीवरील पुलाची दुरवस्था असल्याने शेतात ट्रॅक्टर, अन्य वाहने व साहित्य नेणे अडचणीचे ठरणार आहे. यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. पाटबंधारे विभाग तथा बांधकाम विभागाने शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन पुलाची दुरूस्ती वा नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.