शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

५३ हजारांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे होणार पुनर्गठन

By admin | Updated: April 29, 2016 02:09 IST

जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.

कर्जाची रक्कम ४७४ कोटी रुपये : सर्व गावांची पैसेवारी ५० च्या आतवर्धा : जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. यावर्षी ५३ हजारांवर शेतकरी खातेदार पुनर्गठणासाठी पात्र असून ४७४ कोटी रुपयांच्या रकमेचे पुनर्गठण केले जाणार आहे.यावर्षी जवळपास सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत निघाली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याचा टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. परिणामी, पीक कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. कर्जाची वसुली न करता शेतकऱ्यांनी उचललेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५३ हजार ८६७ शेतकरी यास पात्र असून त्याची रक्कम ४७४ कोटी ३७ लाख रुपये आहे. शेतकऱ्यांंच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे; पण सलग तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीत शेतीचा खर्च हाताबाहेर गेला आहे. उत्पन्न कमी, न मिळणारे भाव, त्यातून कोलमडलेल्या आर्थिक गणिताने थकबाकीदारांची संख्या वाढत आहे. यात पुनर्गठन शेतकऱ्यांना कितपत उपयुक्त आहे, हा प्रश्नच आहे. खरीप हंगामात ३० हजार ३२३ शेतकऱ्यांनी २६३ कोटी ६ लाख रुपये कर्जाची उचल केली. सोबतच ३२ हजार २६४ शेतकरी खातेदारांचे नुतनीकरण करून २८१ कोटी ७६ लाख रुपये कर्र्ज उपलब्ध करण्यात आले. ६२ हजार ५८७ शेतकरी खातेदारांना ५४४ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी दिले होते. यातील ५३ हजार ८३७ शेतकरी पुनर्गठणासाठी पात्र आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)कर्जाचा डोंगर वाढणार ?टंचाई जाहीर झाल्यानंतर कर्जाचे पुनर्गठन केले जाते. यापूर्वीही कर्ज पुनर्गठन झाले. त्या वेळच्या कर्जाची परतफेड व्हायची असताना नव्याने पुनर्गठन करीत कर्ज वाढविले जाणार आहे. गतवर्षी शेतकऱ्याने एक लाख रुपये कर्ज घेतले असेल तर त्या रकमेचे पुनर्गठन म्हणजेच पाच हप्ते पाडले जातील. यात शेतकऱ्यांना कर्ज फेडावे लागेल. पुनर्गठनानंतर शेतकऱ्यांना मागील वेळी उचललेल्या रकमेएवढे वा ऐपतीप्रमाणे कर्ज दिले जाईल. नवीन कर्जाची भर पडणार असल्याने परतफेड कशी करणार, हा प्रश्न आहे.आठ हजारावर शेतकऱ्यांनी केला कर्जाचा परतावाटंचाईची स्थिती असली तरी अनेक शेतकरी वेळेवर परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यातील ८ हजार ७५० शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत ७० कोटी ४५ लाख रुपयांची परतफेड केली. यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. पुनर्गठन केल्यानंतर पहिला हप्ता जून २०१७ मध्ये भरावा लागणार आहे.