शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

५३ हजारांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे होणार पुनर्गठन

By admin | Updated: April 29, 2016 02:09 IST

जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.

कर्जाची रक्कम ४७४ कोटी रुपये : सर्व गावांची पैसेवारी ५० च्या आतवर्धा : जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. यावर्षी ५३ हजारांवर शेतकरी खातेदार पुनर्गठणासाठी पात्र असून ४७४ कोटी रुपयांच्या रकमेचे पुनर्गठण केले जाणार आहे.यावर्षी जवळपास सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत निघाली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याचा टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. परिणामी, पीक कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. कर्जाची वसुली न करता शेतकऱ्यांनी उचललेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५३ हजार ८६७ शेतकरी यास पात्र असून त्याची रक्कम ४७४ कोटी ३७ लाख रुपये आहे. शेतकऱ्यांंच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे; पण सलग तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीत शेतीचा खर्च हाताबाहेर गेला आहे. उत्पन्न कमी, न मिळणारे भाव, त्यातून कोलमडलेल्या आर्थिक गणिताने थकबाकीदारांची संख्या वाढत आहे. यात पुनर्गठन शेतकऱ्यांना कितपत उपयुक्त आहे, हा प्रश्नच आहे. खरीप हंगामात ३० हजार ३२३ शेतकऱ्यांनी २६३ कोटी ६ लाख रुपये कर्जाची उचल केली. सोबतच ३२ हजार २६४ शेतकरी खातेदारांचे नुतनीकरण करून २८१ कोटी ७६ लाख रुपये कर्र्ज उपलब्ध करण्यात आले. ६२ हजार ५८७ शेतकरी खातेदारांना ५४४ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी दिले होते. यातील ५३ हजार ८३७ शेतकरी पुनर्गठणासाठी पात्र आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)कर्जाचा डोंगर वाढणार ?टंचाई जाहीर झाल्यानंतर कर्जाचे पुनर्गठन केले जाते. यापूर्वीही कर्ज पुनर्गठन झाले. त्या वेळच्या कर्जाची परतफेड व्हायची असताना नव्याने पुनर्गठन करीत कर्ज वाढविले जाणार आहे. गतवर्षी शेतकऱ्याने एक लाख रुपये कर्ज घेतले असेल तर त्या रकमेचे पुनर्गठन म्हणजेच पाच हप्ते पाडले जातील. यात शेतकऱ्यांना कर्ज फेडावे लागेल. पुनर्गठनानंतर शेतकऱ्यांना मागील वेळी उचललेल्या रकमेएवढे वा ऐपतीप्रमाणे कर्ज दिले जाईल. नवीन कर्जाची भर पडणार असल्याने परतफेड कशी करणार, हा प्रश्न आहे.आठ हजारावर शेतकऱ्यांनी केला कर्जाचा परतावाटंचाईची स्थिती असली तरी अनेक शेतकरी वेळेवर परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यातील ८ हजार ७५० शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत ७० कोटी ४५ लाख रुपयांची परतफेड केली. यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. पुनर्गठन केल्यानंतर पहिला हप्ता जून २०१७ मध्ये भरावा लागणार आहे.