शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

रामनगर लिज भूखंडांच्या नूतनीकरणात दिरंगाई

By admin | Updated: July 18, 2016 00:36 IST

नगर परिषदेच्या आदेशानुसार लिज धारकांनी जुलै २०१५ मध्ये लिज भूखंडांबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली.

नागरिकांचा आरोप : नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : नगर परिषदेच्या आदेशानुसार लिज धारकांनी जुलै २०१५ मध्ये लिज भूखंडांबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. सोबतच मूळ कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांनी तपासून घेत नागरिकांना परत केली. पालिकेने आता बुधवारी जाहिरात देत मूळ कागदपत्रे मागितली आहे. वास्तविक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय सुस्पष्ट आहे. पालिका प्रशासनच दिरंगाई करीत असल्याने संबंधितांनी लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी त्री-सदस्यीय समितीद्वारे भाडे निर्धारण, समितीने लिजवर दिलेले भूखंड १९९१ ते २०२१ या कालावधीसाठी नूतनीकरण करणे याबाबत दिलेला निर्णय अगदी सुस्पष्ट आहे. यात पालिकेच्या जाहीर सूचनेत नमूद बाबीबद्दल कुठलाही उल्लेख नाही. नागरिकांनी संबंधित विभागाकडे लिज संदर्भातील सर्व कागदपत्रे देऊन ११ महिने लोटली आहे; पण अद्यापही पालिकेने नूतनीकरणाबाबत कार्यवाही केलेली नाही. शिवाय दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास नियमानुसार कार्यवाही करून सदर भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाईल, असे धमकीवजा विधान केले आहे. २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत लिज धारकांचे लोकप्रतिनिधी आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी, नगर रचनाकार आणि न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या निर्णयानुसार पालिकेने कार्यवाही करणे गरजेचे होते. लिज धारकांना पालिकेत बोलविण्याऐवजी रामनगर येथील प्रमुख ठिकाणी अधिकारी पाठवून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नूतनीकरण प्रकरणे त्वरित निकाली काढावी, अशी मागणी नगरसेवक संतोष ठाकूर यांच्यासह नागरिकांनी निवेदनातून केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक दस्तावेज सादर केल्यास नूतनीकरण करण्यात जाईल. आठवड्यातून दोन दिवस शुक्रवार व शनिवारी नागरिकांनी नगर परिषदेमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटावे आणि मूळ दस्तावेजांची तपासणी करून भूखंडांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे सांगितले. यामुळे लिजधारकांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रामनगर लिजधारकांनी नगर परिषदेने जाहीर केलेल्या दिवशी भूखंडांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन संतोष ठाकूर यांनी केले आहे. निवेदन देताना वॉर्डातील केशव डाखोळे, डॉ. गोलावार, डॉ. भलमे, प्रा. देवतळे, विनोद देशमुख, दिनकर लोखंडे, पोराटे, मारोतराव राऊत, बोंडे, अनिल चाळके, नारायण चाळके, भांडवलकर, जडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)