शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रामनगर लिज भूखंडांच्या नूतनीकरणात दिरंगाई

By admin | Updated: July 18, 2016 00:36 IST

नगर परिषदेच्या आदेशानुसार लिज धारकांनी जुलै २०१५ मध्ये लिज भूखंडांबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली.

नागरिकांचा आरोप : नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : नगर परिषदेच्या आदेशानुसार लिज धारकांनी जुलै २०१५ मध्ये लिज भूखंडांबाबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. सोबतच मूळ कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांनी तपासून घेत नागरिकांना परत केली. पालिकेने आता बुधवारी जाहिरात देत मूळ कागदपत्रे मागितली आहे. वास्तविक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय सुस्पष्ट आहे. पालिका प्रशासनच दिरंगाई करीत असल्याने संबंधितांनी लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी त्री-सदस्यीय समितीद्वारे भाडे निर्धारण, समितीने लिजवर दिलेले भूखंड १९९१ ते २०२१ या कालावधीसाठी नूतनीकरण करणे याबाबत दिलेला निर्णय अगदी सुस्पष्ट आहे. यात पालिकेच्या जाहीर सूचनेत नमूद बाबीबद्दल कुठलाही उल्लेख नाही. नागरिकांनी संबंधित विभागाकडे लिज संदर्भातील सर्व कागदपत्रे देऊन ११ महिने लोटली आहे; पण अद्यापही पालिकेने नूतनीकरणाबाबत कार्यवाही केलेली नाही. शिवाय दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास नियमानुसार कार्यवाही करून सदर भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाईल, असे धमकीवजा विधान केले आहे. २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत लिज धारकांचे लोकप्रतिनिधी आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी, नगर रचनाकार आणि न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या निर्णयानुसार पालिकेने कार्यवाही करणे गरजेचे होते. लिज धारकांना पालिकेत बोलविण्याऐवजी रामनगर येथील प्रमुख ठिकाणी अधिकारी पाठवून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नूतनीकरण प्रकरणे त्वरित निकाली काढावी, अशी मागणी नगरसेवक संतोष ठाकूर यांच्यासह नागरिकांनी निवेदनातून केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक दस्तावेज सादर केल्यास नूतनीकरण करण्यात जाईल. आठवड्यातून दोन दिवस शुक्रवार व शनिवारी नागरिकांनी नगर परिषदेमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटावे आणि मूळ दस्तावेजांची तपासणी करून भूखंडांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे सांगितले. यामुळे लिजधारकांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रामनगर लिजधारकांनी नगर परिषदेने जाहीर केलेल्या दिवशी भूखंडांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन संतोष ठाकूर यांनी केले आहे. निवेदन देताना वॉर्डातील केशव डाखोळे, डॉ. गोलावार, डॉ. भलमे, प्रा. देवतळे, विनोद देशमुख, दिनकर लोखंडे, पोराटे, मारोतराव राऊत, बोंडे, अनिल चाळके, नारायण चाळके, भांडवलकर, जडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)