शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नुतनीकरण करा

By admin | Updated: October 31, 2015 03:03 IST

आॅटो रिक्षाचे परवाने नसलेल्या व मुदतबाह्य झालेल्या सर्व आॅटो रिक्षा चालकांनी आपल्या परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक आहे.

सतीश सहस्त्रबुद्धे : आॅटोरिक्षा तपासणी मोहिमेस प्रारंभवर्धा : आॅटो रिक्षाचे परवाने नसलेल्या व मुदतबाह्य झालेल्या सर्व आॅटो रिक्षा चालकांनी आपल्या परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. आॅटो रिक्षा परवान्याचे नुतनीकरण १६ नोव्हेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे. ज्यांचे परवाने नुतनीकरण होणार नाही, ते कायमचे रद्द करण्यात येणार आहेत. परवाने नुतनीकरण न करता वापरल्या जाणाऱ्या सर्व आॅटो रिक्षाची तपासणी मोहीम शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे, अशी मााहिती अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी दिली.परिवहन कार्यालयाच्या सभागृहात आॅटो रिक्षा युनियन व परिवहन विभागच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहस्त्रबुद्धे बोलत होते. उपपरिवहन अधिकारी विनोद जिचकार, सहायक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, आॅटो रिक्षा संघटनेचे प्रमुख देवा निखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.नुतनीकरण न झालेल्या तसेच रद्द झालेल्या आॅटो रिक्षा परवान्याचे नुतनीकरण करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सांगतानाच सहस्त्रबुद्धे म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील ४ हजार २२९ आॅटो रिक्षा परवान्यांपैकी ३ हजार २०० परवान्यांचे मुदत संपूनही नुतनीकरण करण्यात आलेले नाही. आॅटो रिक्षा तपासणी मोहिमेमध्ये दोषी आढळणाऱ्या रिक्षांची नोंदणी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निलंबित अथवा कायमची रद्द करून त्या रिक्षा तांत्रिकदृष्ट्या पुनर्वापरासाठी अपात्र करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. शिवाय विशेष पथके व धडक तपासणी मोहीम राबविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. आॅटो रिक्षा परवानाधारकांनी मुदतबाह्य परवान्याचे नुतनीकरण करून घ्यावे. ज्या आॅटो रिक्षा परवानाधारकाचे परवाने मुदतबाह्य झाले आहे, अशा परवानाधारकांना नव्याने परवाने प्राप्त करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या लॉटरीमध्ये अपात्र ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला मोटार निरीक्षक दुलीसिंग राठोड, मोहन बोर्डे, अशपाक अहमद, आनंद मेश्राम, सहायक निरीक्षक एस.एस. सुरळकर, चव्हाण आदी उपस्थित होते. आॅटो रिक्षाच्या परवाना नुतनीकरणासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी यावेळी वर्धा आॅटो रिक्षा युनियनतर्फे करण्यात आली. बैठकीमध्ये आॅटो रिक्षा परवाना धारक चालक, मालकांनी आपल्या समस्याही अधिकाऱ्यांसमोर कथन केल्या.(कार्यालय प्रतिनिधी)