शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव-पुलगाव मार्ग शहराबाहेरून काढा

By admin | Updated: June 15, 2017 00:50 IST

शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा तळेगाव-पुलगाव मार्ग शहराच्या बाहेरून काढावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापारी

अमर काळे : अतिक्रमणात व्यापाऱ्यांवर होणारा अतिरेक थांबवा लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा तळेगाव-पुलगाव मार्ग शहराच्या बाहेरून काढावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापारी व नागरिकांवर करण्यात येत असलेली अतिरेकी कारवाई थांबवावी, अशी मागणी आ. अमर काळे यांनी केली. याबाबत मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या तळेगाव-पुलगाव राज्यमार्गाचे विस्तारीकरण काम सुरू करण्याकरिता नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभागीय अधिकारी यांनी सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अनेक दुकांनाची तोडफोड करण्यात आली. नागरिकांच्या दारांसमोर खड्डे खोदून त्यांच्या जाण्या-येण्याचा मार्ग बंद करण्यात आला. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या सोयीकरिता ३० लाख रुपये खर्चून बांधकाम विभागानेच बांधलेल्या भूमिगत नालीवरील स्लॅब तोडून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर सहा फुट खोल खड्डा पाडला. यात पावसाळ्यात पाणी साचून होणाऱ्या घाणीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सोयीकरता माजी आमदार डॉ. शरद काळे यांच्या निधीतून सुमारे दोन लाख रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला प्रवासी निवारा अकारणत पाडण्यात आला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून उन्ह, पावसाचा सामना करावा लागत आहे. तळेगाव-पुलगाव राज्य मार्गा मध्यवस्तीतून गेल्यास शहराचे दोन भागात विभाजन होणार आहे. याचा दुष्परिणाम शहरातील जनजीवनावर होणार आहे. या मार्गावर शासकीय कार्यालये, न्यायालय, शाळा आदी असल्याने हा मार्ग नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरणार आहे. रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात जीव गमवावा लागणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठही याच मार्गावर असल्याने व्यवसाय मोडकळीस येणार असून शेकडो तरूणांचा रोजगार हिरावला जाणार आहे. शहरातील मुख्य मार्गाच्या सौंदर्यीकरणाला विरोध नाही, तो व्हावा; पण तळेगाव-पुलगाव महामार्ग शहराच्या बाहेरून काढावा, नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या मध्यवस्तीत अतिक्रमण काढण्यापूर्वी दुकानदारांना व नागरिकांना त्यांच्या जागा आखून देत पूर्वसूचना द्यावी. नंतरच कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना निरज बेलवे, हरेश रावलानी, अनिल जैन, अनंत पांडे, विजय झेंडे, शे. मोहम्मद शे. रमजान, नितीन चिमोटे, अनिल राठी, करण मोटवाणी, कटियारी, आबीद अली इमदाद अली आदी उपस्थित होते.