शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

तळेगाव-पुलगाव मार्ग शहराबाहेरून काढा

By admin | Updated: June 15, 2017 00:50 IST

शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा तळेगाव-पुलगाव मार्ग शहराच्या बाहेरून काढावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापारी

अमर काळे : अतिक्रमणात व्यापाऱ्यांवर होणारा अतिरेक थांबवा लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा तळेगाव-पुलगाव मार्ग शहराच्या बाहेरून काढावा. अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यापारी व नागरिकांवर करण्यात येत असलेली अतिरेकी कारवाई थांबवावी, अशी मागणी आ. अमर काळे यांनी केली. याबाबत मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या तळेगाव-पुलगाव राज्यमार्गाचे विस्तारीकरण काम सुरू करण्याकरिता नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभागीय अधिकारी यांनी सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अनेक दुकांनाची तोडफोड करण्यात आली. नागरिकांच्या दारांसमोर खड्डे खोदून त्यांच्या जाण्या-येण्याचा मार्ग बंद करण्यात आला. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या सोयीकरिता ३० लाख रुपये खर्चून बांधकाम विभागानेच बांधलेल्या भूमिगत नालीवरील स्लॅब तोडून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर सहा फुट खोल खड्डा पाडला. यात पावसाळ्यात पाणी साचून होणाऱ्या घाणीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सोयीकरता माजी आमदार डॉ. शरद काळे यांच्या निधीतून सुमारे दोन लाख रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला प्रवासी निवारा अकारणत पाडण्यात आला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून उन्ह, पावसाचा सामना करावा लागत आहे. तळेगाव-पुलगाव राज्य मार्गा मध्यवस्तीतून गेल्यास शहराचे दोन भागात विभाजन होणार आहे. याचा दुष्परिणाम शहरातील जनजीवनावर होणार आहे. या मार्गावर शासकीय कार्यालये, न्यायालय, शाळा आदी असल्याने हा मार्ग नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरणार आहे. रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात जीव गमवावा लागणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठही याच मार्गावर असल्याने व्यवसाय मोडकळीस येणार असून शेकडो तरूणांचा रोजगार हिरावला जाणार आहे. शहरातील मुख्य मार्गाच्या सौंदर्यीकरणाला विरोध नाही, तो व्हावा; पण तळेगाव-पुलगाव महामार्ग शहराच्या बाहेरून काढावा, नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या मध्यवस्तीत अतिक्रमण काढण्यापूर्वी दुकानदारांना व नागरिकांना त्यांच्या जागा आखून देत पूर्वसूचना द्यावी. नंतरच कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना निरज बेलवे, हरेश रावलानी, अनिल जैन, अनंत पांडे, विजय झेंडे, शे. मोहम्मद शे. रमजान, नितीन चिमोटे, अनिल राठी, करण मोटवाणी, कटियारी, आबीद अली इमदाद अली आदी उपस्थित होते.