शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डातील त्रुटी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:57 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्य गरीब मानसांना वितरीत होणारे धान्य रेशन कार्डातील व प्रक्रियेतील त्रुटींमुळे मिळत नाही. या त्रुटी दूर करून गरीब नागरिकांना धान्य वितरण सुकर करावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

ठळक मुद्देजनवादी महिला संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्य गरीब मानसांना वितरीत होणारे धान्य रेशन कार्डातील व प्रक्रियेतील त्रुटींमुळे मिळत नाही. या त्रुटी दूर करून गरीब नागरिकांना धान्य वितरण सुकर करावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक देवून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा हाडके, सचिव दुर्र्गा काकडे, ज्येष्ठ नेत्या निर्मला वाघ यांनी केले. रेशनचे धान्य हा सर्वसामान्य गरीबांचा हक्क आहे. ते धान्य त्यांना मिळाले पाहिजे, यासाठी प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात. धान्य वाटपाचे प्रमाण प्रत्येक योजनेचे दर फलक लावून सर्वसामान्यांना कळवावे. नवीन रेशन कार्ड मागणाºयांना तातडीने ते वितरीत करण्यात यावे. जीर्ण रेशन कार्ड बदलून देण्यात यावे. पॉझ मशीनमध्ये अनेक लाभार्थ्यांचे अंगठे व्यवस्थीत जुळत नाही. त्यामुळे त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागते. यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. आरसी क्रमांक प्रत्येक कार्डधारकांना द्यावा. पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ महिलांना देण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले व याबाबत त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली.सदर मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले. सदर मोर्चात अंजना काकडे, आरती पवार, कांता प्रधान, तुळसा पोले, भूमिका गाणार, लता टाक, कुंदा घंगारे, भारती रायकर, विमल पूजारी, चंदा वासेकर, द्वारका डांगे, पार्बता मुडे, रंजना पचारे, संगीता भगत, प्रतिभा कावनकुळे, सिंधू दांडेकर, माया चहांदे, प्रमिला नागपुरे, रंजना रंगारी, लंका धुर्वे, शारदा गजभिये, उषा राऊत, निर्मला झाडे, दिपमाला मालेकर, बेबी मन्ने, पंचफुला म्हैसकर, कालींदी कांबळे, कुमूद अरगडे, दुर्गा सहारे आदी सहभागी झाल्या होत्या.