शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

खत कारखान्यातील कामगारांवरील अन्याय दूर करा

By admin | Updated: July 25, 2016 02:02 IST

महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी सेवाग्राम येथील खत कारखान्यातील कंत्राटी कामागारांवर अन्याय होत आहे.

शिवसेना : जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी सेवाग्राम येथील खत कारखान्यातील कंत्राटी कामागारांवर अन्याय होत आहे. तो अन्याय दूर करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा. उद्योग अधिनियम १९४७ च्या कायद्यानुसार थकित वेतन व सेवा संपुष्टात आणल्याने त्यांना सेवेच्या संलग्नतेसह मागील वेतनासह पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली. याबाबत जिल्हा कामगार अधिकारी राजरत्न धुर्वे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ येथे गत पाच वर्षांपासून कार्यरत कामगार मनोहर धोंडबाजी सोनवणे (३३) रा. जयपूर, ता. सेलू व शुभम कमलाकर उईके (२७) रा. तळोदी, ता. सेलू यांना कुठलीही चुक नसताना ३० जून २०१६ रोजी कामावरून कमी केले. त्यांना त्वरित कामगार घेण्यात यावे. कामगारांकडे कृ.उ.वि. महामंडळ वर्धा येथे काम करीत असल्याचा कुठलाही पुरावा नाही. कामगारांना नेमके वेतन किती आहे, पीएफ किती कपात होतो, हे माहिती नाही. वरिष्ठांना विचारणा केल्यास माहिती मिळत नाही. यासाठी पीएफ व वेतन पावती द्यावी. वेतनाचा दिनांकही निश्चित करावा. सुरक्षा सुविधा मिळत नाही. बुट, गणवेश, हातमोजे आदी फॅक्टरी अ‍ॅक्टमध्ये येणाऱ्या सुविधा द्याव्या. औषधोपचार, ठराविक सुट्टी मिळत नाही. कामगारांना पूर्ववत कामावर घेत कंपनी अ‍ॅक्टनुसार सुविधा द्याव्या, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख तुषार देवढे, प्रा. राजू गोरडे, कामगार प्रतिनिधी मनोज आतराम, गौरव भेलाये, विवेक मुंजेवार, गजानन बनकर, राजू ठेकेदार, अभय देवढे, मनोहर सोनवणे, नितेश राऊत, विजय कोहळे, उमेश राऊत यासह कामगार उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)