शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

खत कारखान्यातील कामगारांवरील अन्याय दूर करा

By admin | Updated: July 25, 2016 02:02 IST

महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी सेवाग्राम येथील खत कारखान्यातील कंत्राटी कामागारांवर अन्याय होत आहे.

शिवसेना : जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी सेवाग्राम येथील खत कारखान्यातील कंत्राटी कामागारांवर अन्याय होत आहे. तो अन्याय दूर करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा. उद्योग अधिनियम १९४७ च्या कायद्यानुसार थकित वेतन व सेवा संपुष्टात आणल्याने त्यांना सेवेच्या संलग्नतेसह मागील वेतनासह पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली. याबाबत जिल्हा कामगार अधिकारी राजरत्न धुर्वे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ येथे गत पाच वर्षांपासून कार्यरत कामगार मनोहर धोंडबाजी सोनवणे (३३) रा. जयपूर, ता. सेलू व शुभम कमलाकर उईके (२७) रा. तळोदी, ता. सेलू यांना कुठलीही चुक नसताना ३० जून २०१६ रोजी कामावरून कमी केले. त्यांना त्वरित कामगार घेण्यात यावे. कामगारांकडे कृ.उ.वि. महामंडळ वर्धा येथे काम करीत असल्याचा कुठलाही पुरावा नाही. कामगारांना नेमके वेतन किती आहे, पीएफ किती कपात होतो, हे माहिती नाही. वरिष्ठांना विचारणा केल्यास माहिती मिळत नाही. यासाठी पीएफ व वेतन पावती द्यावी. वेतनाचा दिनांकही निश्चित करावा. सुरक्षा सुविधा मिळत नाही. बुट, गणवेश, हातमोजे आदी फॅक्टरी अ‍ॅक्टमध्ये येणाऱ्या सुविधा द्याव्या. औषधोपचार, ठराविक सुट्टी मिळत नाही. कामगारांना पूर्ववत कामावर घेत कंपनी अ‍ॅक्टनुसार सुविधा द्याव्या, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख तुषार देवढे, प्रा. राजू गोरडे, कामगार प्रतिनिधी मनोज आतराम, गौरव भेलाये, विवेक मुंजेवार, गजानन बनकर, राजू ठेकेदार, अभय देवढे, मनोहर सोनवणे, नितेश राऊत, विजय कोहळे, उमेश राऊत यासह कामगार उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)