शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या मोजणीनुसार अतिक्रमण काढा

By admin | Updated: December 28, 2016 00:52 IST

तालुक्यातील तळेगाव (टा.) येथे मुख्य जिल्हा मार्ग १९ च्या निर्मितीच्या अनुषंगाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती

तळेगाव (टा.) च्या ग्रामस्थांची मागणी : बांधकाम विभागाला ठरावासह निवेदन वर्धा : तालुक्यातील तळेगाव (टा.) येथे मुख्य जिल्हा मार्ग १९ च्या निर्मितीच्या अनुषंगाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती; पण ती अर्धवट सोडण्यात आली. त्यावेळी केलेल्या मोजणीनुसार उर्वरित अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. तळेगाव (टा.) ग्रामपंचायतीनेही तत्सम ठराव घेतला; पण कार्यवाही झाली नाही. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत जुन्या मोजणीनुसार भेदभाव न करता अतिक्रमण हटवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तळेगाव (टा.) ते एकुर्ली हा सहा किमी रस्ता पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता. तत्पूर्वी तो पांदण रस्ता होता. जिल्हा परिषदेने या मार्गाचा मालकी हक्क २००१ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला. या मार्गावर ३.७५ मीटरचे डांबरीकरण होते. हा मुख्य जिल्हा मार्ग १९ असल्याने भूमी अभिलेख विभागाकडून जागेचे मोजमाप करून घेण्यात आले. यानुसार महसूल विभागाने ८० फुट परिसरात शासकीय जागा असल्याचे जाहीर केले. यानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. असे असले तरी हे काम अर्धवट सोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अर्धवट राहिलेले अतिक्रमण काढण्याचे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. यापूर्वी अतिक्रमण हटविण्याच्या कामात केवळ गरीब नागरिकांची घरे पाडण्यात आली. थोडीफार ओळख वा राजकारण्यांशी संबंध असलेल्या व्यक्तींची घरे आजही जैसे थे आहेत. याबाबत २ आॅक्टोबर २०१५ रोजी बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले; पण अद्याप त्यावर कुठलीही चौकशी वा कार्यवाही करण्यात आलेली नाही. गावाचा मुख्य रस्ता असलेल्या या मार्गाचे काम अद्याप अर्धवटच आहे. या मार्गाने जड वाजनांची दळणवळण करताना त्रास सहन करावा लागत आहे. या मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रा.पं. प्रशासनाने ठरावही घेऊन बांधकाम विभागाला सादर केला; पण त्यावरही कार्यवाही केली नाही. काही दिवसांपूर्वी पुन्हा त्या जागेची मोजणी करण्यात आली. यापूर्वीचे मोजमाप वेगळे होते. यामुळे पूर्वीच्या मोजमापानुसार अतिक्रमण हटवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन, उपोषण करण्यात येईल, असा इशारा कैलाश कोपरकर, निशान हातेकर, गजानन शेंडे व ग्रामस्थांनी दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी) धनदांडगे व राजकारण्यांशी सलगी असलेल्यांचे अतिक्रमण कायम मुख्य जिल्हा मार्ग १९ च्या निर्मितीसाठी तीन वर्षांपूर्वी प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी मोजमाप करून ८० फुट परिसर शासकीय असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या भागातील अतिक्रमण काढण्यात येत होत; पण यातील १२ मीटरपर्यंतच अतिक्रमण काढण्यात आले. यानंतर अतिक्रमण हटविण्याची मोहीमच थंडबस्त्यात पडली. या कारवाईमध्ये केवळ गोरगरीब नागरिकांची घरे तुटली; पण धनदांडगे व राजकारणी वा राजकीय पार्ट्यांशी सलगी असलेल्या नागरिकांची अतिक्रमणातील घरे जैसे थे राहिली. या मोहिमेत भेदभाव करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.