शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धर्म हा कर्मकांडासाठी नसून मानव कल्याणासाठी

By admin | Updated: January 15, 2017 00:48 IST

माणूस पृथ्वीवर सर्व प्राण्यांच्या नंतर जन्माला आला. तेव्हा, त्याला जगण्याचा, चांगला वागण्याचा हक्क व अधिकार निसर्गदत्तच मिळाले.

शेख हाशम : लोकतंत्र व मानवाधिकार विषयावर व्याख्यान वर्धा : माणूस पृथ्वीवर सर्व प्राण्यांच्या नंतर जन्माला आला. तेव्हा, त्याला जगण्याचा, चांगला वागण्याचा हक्क व अधिकार निसर्गदत्तच मिळाले. कालांतराने माणसाने कसं जगावं, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे नियम म्हणजे धर्म होय. ते सामाजिकतेला जवळ करणारे आहे. सामाजिकतेचा आशय महत्त्वाचा आहे. समाज जीवनात येणारे संघर्ष टाळण्यासाठी नियम असतात. त्याचेच रूपांतर म्हणजे धर्म होय. धर्म हा कर्मकांडासाठी नसून तो मानव कल्याणासाठी आहे, असे मत राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक व माजी अधिव्याख्यायते प्रा. शेख हाशम यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनेकांत स्वाध्याय मंदिर, राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विविध पुरोगामी संस्था व संघटना समन्वय समिती, वर्धा यांच्या सहकार्याने अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. २३ व्या अभ्यासवर्गात लोकतंत्र व मानवाधिकार या विषयावर झालेल्या व्याख्यानात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणू प्रा. शेख हाशम बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्र अंनिसचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, अनेकांत स्वाध्याय मंदिरचे ट्रस्टी अरूण चवडे, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंडे, विठ्ठल गुल्हाणे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. हाशम शेख म्हणाले, मानवाधिकारात माणसाला सहज, सुरक्षित घटक उपयोगी ठरतील. स्वातंत्र्य म्हणजे त्याच्या गुणाचा विकास. व्यक्तीत्व स्वातंत्र्यातून अधिकाराची अभिव्यक्ती होते. माणसाला विकासासाठी प्रोत्साहित करते. हेच मानवाधिकाराचे महत्वाचे मुल्य आहे. मानवी अधिकार अविभाज्य घटक आहे. मानवधिकाराचा उदय जन्मताच निसर्गदत्त असला तरी त्याचा उदय इ.स. ५०० ते ५३९ पार्शियाचा राजा सायरस यांच्या काळात झाला. सायरसने बाबोलियन राज्य लुटल्यानंतर गुलामांना स्वातंत्र्य देऊन त्यांना समुहासोबत, कुटुंबासोबत राहण्याची मुभा दिली. ते इच्छेनुसार कोणताही अस्तित्वात असलेला धर्म स्वीकारू शकतात. पुढे मॅग्नाकार्टा याने इ.स. १२०० तर ग्रेगचार्टर इ.स. १२१५ मध्ये मानवधिकाराचा आग्रह धरला. मानवाधिकाराचे लिखाण पुर्वी मातीच्या राजणावर लिहल्या गेले. ही बाब या दोघांनी निदर्शनास आणून दिल्यावर त्याला अमेरिकन सायरस सिलेंडर असेही म्हटल्या गेले. आज मानवाधिकाराचे सतत उल्लंघन होतांना दिसते. पोलिसांची मारहाण, कौटुंबिक हिंसा, लैंगिक अत्याचार, त्यांचे उत्पीडन, स्त्री-पुरूष भेट, आदिवासीवर होणारे अत्याचार, बालहक्क, श्रमिकांचे अधिकारी इत्यादीतून उल्लंघन होत आहे. त्यासाठी पुरूष प्रधान मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सोबतच प्रत्येकाने राज्यघटनेने दिलेले कर्तव्याचे पालन करणे, कर भरणे, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे पालन करणे प्रत्येकाच्या धार्मिक कार्यात उपस्थित राहणे, किमान ५ धर्माच्या व्यक्तींसोबत मित्रता वाढविणे. अनाठायी खर्चावर अंकुश आणने, यामुळे लोकतंत्र जिवंत राहून मानवधिकाराचे होणारे उल्लंघन थांबविता येईल, असे मत प्रा. हाशम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र कांबळे यांनी केले. प्रास्ताविक सुनील सावध यांनी तर अतिथी परिचय अ‍ॅड. पुजा जाधव यांनी करुन दिला. आभार भास्कर नेवारे यांनी मानले. कार्यक्रमाला अनिल मुरडीव सुधाकर मिसाळ, मयूर डफळे, डॉ. चेतना सवाई, सुनील ढाले, सुनील बोरकर, प्रकाश कांबळे यांनी सहकार्य केले. व्याख्यानाला शहरातील गणमान्य व्यक्ती तसेच नागरिकांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)