शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

गांधीजींच्या भाषणाच्या दुर्मीळ ध्वनिफितीचे आश्रमात विमोचन

By admin | Updated: October 5, 2014 23:12 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी दिवाळीनिमित्त लोकहितवाहिनीला दिलेल्या १० मिनिटांच्या मुलाखतीची ध्वनिफित दिग्रस तालुक्यातील कांदळी या छोट्याशा गावातील असलम खान

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी दिवाळीनिमित्त लोकहितवाहिनीला दिलेल्या १० मिनिटांच्या मुलाखतीची ध्वनिफित दिग्रस तालुक्यातील कांदळी या छोट्याशा गावातील असलम खान नामक शिक्षकाने गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम परिसरात प्रत्यक्ष येवून ऐकविली. गांधीजीच आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव यावेळी उपस्थितांना आला.रेडिओवरील आवाज मुद्रित करून आगळावेगळा उपक्रम असलम खान राबवितात. महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी आकाशवाणी धुळे केंद्रावरून लोकहितवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीचे ध्वनीमुद्रण खान यांनी केले होते. आज ही मुलाखत अत्यंत दुर्र्मिळ असून महात्मा गांधींच्या आवाजातील ध्वनिफित असलम खान यांनी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत मठकर यांना दिली. यावेळी लोकवाहिनीद्वारे प्रसारित केलेली मुलाखत सर्वांना ऐकविण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याच्या कांदळी येथील असलम खान या सेवानिवृत्त शिक्षकाकडे ८ हजार बोलक्या ध्वनिमुद्रणांचा संग्रह आहे. यामध्ये हजारो आवाज अत्यंत कल्पकतेने त्यांनी संग्रहित केले आहे. १९९२ पासून आकशवाणी तसेच बीबीसी, व्हॉईस आॅफ अमेरिका, व्हॉईस आॅफ जर्मनी या केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचेही त्यांनी ध्वनिमुद्रण केले आहे. खान यांच्याकडे असलेल्या ८ हजार ध्वनिमुद्रण संग्रहामध्ये भारत माता ही संग्रहमाला असून आझादी की तयारी, पचास दिन, पचास साल पहले यास मधुकर उपाध्याय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा कार्यक्रमही ध्वनिमुद्रित आहे. २६ जून १९४७ ते १५ आॅगस्ट १९४७ या काळातील भारतीय स्वातंत्र्याची चळवळ तसेच महात्मा गांधी, जॉन केनेडी यांची भाषणेही संग्रहीत आहेत.(शहर प्रतिनिधी)