शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तुरीला तहसीलदारांसमक्ष नकार

By admin | Updated: April 10, 2017 01:26 IST

शेतकऱ्यांच्या चांगल्या तुरीला नापास करून तीच तूर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नाफेडचे अधिकारी खरेदी कारीत

शेतकऱ्यांचा आरोप : आर्वी बाजारातील प्रकारआर्वी : शेतकऱ्यांच्या चांगल्या तुरीला नापास करून तीच तूर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नाफेडचे अधिकारी खरेदी कारीत असल्याचा प्रकार येथील बाजार समितीत तहसीलदारांच्या समक्षच उघड झाला. या व्यवहारात व्यापारी व नाफेडच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कमाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर नाफेडची तूर खरेदी सुरू आहे. मार्केट यार्डवर आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची तपासणी करण्याकरिता एनसीएमसी कंपनीचा तज्ज्ञाची नेमणूक केलेली आहे. नाफेडच्या निकषाप्रमाणे ३ टक्के पर्यंत खराब दाणे असलेली तूर खरेदी केल्या जावू शकते. याचा लाभ उचलत जो मलीदा देईल, त्याची तूर पास करण्याचा प्रकार येथे होत आहे. तर निकषात बसणारी तूर नापास करण्याचा प्रकार होत आहे. यामुळे निराश झालेला शेतकरी वाहतुकीचा खर्च झेपत नसल्याने तो मार्कट यार्डवरच व्यापाऱ्याला ३,५०० रुपयांत विकतो. व्यापाऱ्याकडून तोच माल पुन्हा नाफेडचे कर्मचारी पास करून खरेदी करीत आहे. यात व्यापारी एका दिवसात सुमारे १,५०० रुपयांची कमाई बसल्या ठिकाणी करतो तर शेतकऱ्याला उत्पादनाला लागलेला पैसासुद्धा मिळत नसल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेसचे वर्धा जिल्हा लोकसभा मतदार संघाचे महासचिव सचिन वैद्य यांनी केला असून चौकशीची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोलवण्यावरुन पिंपरी पुनर्वसन येथील शेतकरी रज्जाक अली यांनी ६० क्विंटल तूर येथील मार्केट यार्डवर आणली. त्यांचा माल निकषपात्र असताना सुद्धा नाफेडच्या कर्मचाऱ्याने नापास केला. यामुळे सदर शेतकऱ्याने सचिन वैद्य यांच्या माध्यमातून येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांच्याकडे याची तक्रार केली. परिणामी, त्यांनी तहसीलदार विजय पवार व तालुका कृषी अधिकारी पी.डी. गुल्हाणे यांना बाजारात पाठविले. तहसीलदार विजय पवार यांनी नाफेडच्या कर्मचाऱ्याच्या हाताने रज्जाक अली यांच्या तुरीचा नमुना व यापूर्वी नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचा नमूना बोलविला. त्याचे परीक्षण त्यालाच करायला सांगितले. यात आधी खरेदी केलेल्या तुरीच्या नमुन्यात १.६२ टक्के खराब दाणे आढळून आले तर रज्जाक अली यांच्या तुरीच्या नमून्यात फक्त ०.५३ टक्केच खराब दाणे असल्याचे दिसून आले. येथेच नाफेड कर्मचाऱ्याची बदमाशी उघड झाली.