शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:41 IST

आर्वी विधानसभा क्षेत्रातील माळेगाव (ठेका), मरकसुर, मेटहिरजी, उमरविहरी, येणीदोडका आदी गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करावा.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : श्वापदांच्या हैदोसाने ग्रामस्थ त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रातील माळेगाव (ठेका), मरकसुर, मेटहिरजी, उमरविहरी, येणीदोडका आदी गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करावा. तसेच सदर गावांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.या गावातील शेतकºयांना श्वापदांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यांना शेती करणे कठीण झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. श्वापदांमुळे मात्र ग्रामस्थांना शेतात जाणे कठीण झाले आहे. व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच अन्य महत्त्वाच्या कामासाठी ग्रामस्थांना कारंजा, आर्वी, वर्धा, सेलू येथे जावे लागते. येथे पोहचण्यासाठी जंगल परिसरातून जावे लागत असल्याने ग्रामस्थ धास्तावलेले असतात. जीव मुठीत घेऊनच ग्रामस्थ प्रवास करतात. या सर्व पाश्र्वभूमीवर येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.त्यामुळे या गावांचे पुनर्वसन गरजेचे झाले आहे. येथील ग्रामस्थ दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहे.या गावांचे पुनर्वसन जंगल परिक्षेत्राच्या बाहेर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडलेल्या समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर ग्राम्स्थांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.निवेदन देताना राजू कदम, प्रशांत वानखेडे, शिरीष भांगे, मंगेश खवशी, अशोक विजेकर, हरीभाऊ जसुतकर, आश्विन शेंडे, धिरेंद्र शेंडे, निखिल कडु, रोशन पवार, दिनेश डेहनकर, जगदीश डोळे, सागर ठाकरे, अनिल लेंडे, विजय तभाने, उधाराम मंढाळे, पांडुरंग मडावी, सुखदेव उईके, मार्गेश्वर सलाम, सुधाकर वरटी, पुनिराम उईके, बालू शेंडे, किशोर पट्टे, किरण येडमे, नितेश शिरसाम, हरिदास भलावी, राधेश्याम अवथळे, नरेश डोळे, शेषराव सपकाळ, राजु सपकाळ, कृष्णा पेठकुले तसेच माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहरी, येनिदोडका व मरकसुर येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.शेती ठेवावी लागते पडीकआर्वी तालुक्यातील काही गावे बोरधरण व्याघ्र प्रकल्पालगत आहे. त्यामुळे या गावात वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. गावातील रहिवासी श्वापदांमुळे धास्तावलेले आहे. हा परिसर जंगलक्षेत्राने वेढलेला आहे. वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असून रोही, रानडुक्कर हे प्राणी शेतात शिरून नासाडी करतात त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे.