शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:41 IST

आर्वी विधानसभा क्षेत्रातील माळेगाव (ठेका), मरकसुर, मेटहिरजी, उमरविहरी, येणीदोडका आदी गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करावा.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : श्वापदांच्या हैदोसाने ग्रामस्थ त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रातील माळेगाव (ठेका), मरकसुर, मेटहिरजी, उमरविहरी, येणीदोडका आदी गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करावा. तसेच सदर गावांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.या गावातील शेतकºयांना श्वापदांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यांना शेती करणे कठीण झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. श्वापदांमुळे मात्र ग्रामस्थांना शेतात जाणे कठीण झाले आहे. व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच अन्य महत्त्वाच्या कामासाठी ग्रामस्थांना कारंजा, आर्वी, वर्धा, सेलू येथे जावे लागते. येथे पोहचण्यासाठी जंगल परिसरातून जावे लागत असल्याने ग्रामस्थ धास्तावलेले असतात. जीव मुठीत घेऊनच ग्रामस्थ प्रवास करतात. या सर्व पाश्र्वभूमीवर येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.त्यामुळे या गावांचे पुनर्वसन गरजेचे झाले आहे. येथील ग्रामस्थ दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहे.या गावांचे पुनर्वसन जंगल परिक्षेत्राच्या बाहेर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडलेल्या समस्येचे गांभिर्य लक्षात घेऊन त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर ग्राम्स्थांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.निवेदन देताना राजू कदम, प्रशांत वानखेडे, शिरीष भांगे, मंगेश खवशी, अशोक विजेकर, हरीभाऊ जसुतकर, आश्विन शेंडे, धिरेंद्र शेंडे, निखिल कडु, रोशन पवार, दिनेश डेहनकर, जगदीश डोळे, सागर ठाकरे, अनिल लेंडे, विजय तभाने, उधाराम मंढाळे, पांडुरंग मडावी, सुखदेव उईके, मार्गेश्वर सलाम, सुधाकर वरटी, पुनिराम उईके, बालू शेंडे, किशोर पट्टे, किरण येडमे, नितेश शिरसाम, हरिदास भलावी, राधेश्याम अवथळे, नरेश डोळे, शेषराव सपकाळ, राजु सपकाळ, कृष्णा पेठकुले तसेच माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहरी, येनिदोडका व मरकसुर येथील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.शेती ठेवावी लागते पडीकआर्वी तालुक्यातील काही गावे बोरधरण व्याघ्र प्रकल्पालगत आहे. त्यामुळे या गावात वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. गावातील रहिवासी श्वापदांमुळे धास्तावलेले आहे. हा परिसर जंगलक्षेत्राने वेढलेला आहे. वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असून रोही, रानडुक्कर हे प्राणी शेतात शिरून नासाडी करतात त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे.