शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित गावे ब्लिचिंग पावडरविना

By admin | Updated: August 10, 2016 00:31 IST

तालुक्यातील १५ गावांचे आर्वीलगतच पुनर्वसन करण्यात आले; परंतु पुनर्वसन झाल्यापासून निम्नवर्धा विभागाने या गावात ब्लिचिंग पावडरचा पुरवठा केला नाही.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आर्वी : तालुक्यातील १५ गावांचे आर्वीलगतच पुनर्वसन करण्यात आले; परंतु पुनर्वसन झाल्यापासून निम्नवर्धा विभागाने या गावात ब्लिचिंग पावडरचा पुरवठा केला नाही. परिणामी गावकऱ्यांना स्वत: अधिक भावाने बाजारातून ब्लिचिंगची खरेदी करून पाणी शुद्ध करावे लागत आहे. आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील गावातील जीर्ण पाण्याची टाकी पाडल्याने बोअरींगमधून गावाला पाणी पुरवठा होतो. या बोअरींगचे पाणी शुध्द नसल्याने सध्या या पाण्यामुळे गावात साथीच्या आजाराची भीती वर्तविली जात आहे. पुनर्वसन झालेल्या सर्कसपूर येथील गावात पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी नियमित धुतल्या जात नाही. या गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी फुटल्याने ७५० लोकवस्तीच्या गावात काही भागात पाणी पुरवठा होत नसल्याने खोदलेल्या खड्ड्यातून पाणी भरावे लागते आहे. पुनर्वसन गावातील अहिरवाडा, राजापूर, वाढोडा, इटलापूर येथील गावकरी व ग्रामपंचायत संघटना गावकऱ्यांच्या पुढाकाराने ब्लिचिंग पावडरची खरेदी करते. गत आठ वर्षांपासून राजापूर ग्रामपंचायतने या ब्लिचिंग पावडर पुरवठ्याची मागणी करूनही पावसाळ्यापूर्वी ब्लिचिंग पावडर वेळेवर दिले नाही. पुनर्वसन गावात शुध्द पाणी पुरवठा होत नसल्याने पंचायत समिती विभागाने या पुनर्वसन गावात मुलभूत सोई सुविधा पुरवाव्या, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजाराला पुनर्वसन गावातील सदोष पाणी पुरवठ्याची जागोजागी फुटलेली पाईपलाईन सांडपाण्याने वाहून जाण्यासाठी नाल्याच नसल्याने पावसाळ्यात पुनर्वसन गावाचा आरोग्याचा प्रश्न दरवर्षी गंभीर होतो. गत आठ ते दहा वर्षांपासून आर्वी तालुक्यातील या पुनर्वसन गावांचे प्रश्न सदोष पाणीपुरवठा योजना व सांडपाण्याचे योग्य नियोजन केले नसल्याने दरवर्षी गंभीर होत आहे. यावर पुनर्वसन विभागाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांची आहे.(तालुका प्रतिनिधी) गावात ब्लिचिंग पावडरचा पुरवठा अनियमीत होतो. पिण्याच्या पाण्याची टाकी धुतल्याच जात नाही. पाणी पुरवठ्याची पाईप लाईन जागोजागी फुटली आहे. - निखील कडू, उपसरपंच, सर्कसपूर, ता. आर्वी. राजापूर गावात गत आठ-दहा वर्षांपासून ब्लिचिंग पावडरचा पुरवठाच होत नाही. आम्ही गावकरी बाजारातून अधिक भावाने ब्लिचिंग पावडर खरेदी करतो. संबंधीत पुनर्वसन विभागाला वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. - प्रा. धमेंद्र राऊत, अध्यक्ष सरपंच संघटना, वर्धा