शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

पुनर्वसित गावे ब्लिचिंग पावडरविना

By admin | Updated: August 10, 2016 00:31 IST

तालुक्यातील १५ गावांचे आर्वीलगतच पुनर्वसन करण्यात आले; परंतु पुनर्वसन झाल्यापासून निम्नवर्धा विभागाने या गावात ब्लिचिंग पावडरचा पुरवठा केला नाही.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आर्वी : तालुक्यातील १५ गावांचे आर्वीलगतच पुनर्वसन करण्यात आले; परंतु पुनर्वसन झाल्यापासून निम्नवर्धा विभागाने या गावात ब्लिचिंग पावडरचा पुरवठा केला नाही. परिणामी गावकऱ्यांना स्वत: अधिक भावाने बाजारातून ब्लिचिंगची खरेदी करून पाणी शुद्ध करावे लागत आहे. आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील गावातील जीर्ण पाण्याची टाकी पाडल्याने बोअरींगमधून गावाला पाणी पुरवठा होतो. या बोअरींगचे पाणी शुध्द नसल्याने सध्या या पाण्यामुळे गावात साथीच्या आजाराची भीती वर्तविली जात आहे. पुनर्वसन झालेल्या सर्कसपूर येथील गावात पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी नियमित धुतल्या जात नाही. या गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी फुटल्याने ७५० लोकवस्तीच्या गावात काही भागात पाणी पुरवठा होत नसल्याने खोदलेल्या खड्ड्यातून पाणी भरावे लागते आहे. पुनर्वसन गावातील अहिरवाडा, राजापूर, वाढोडा, इटलापूर येथील गावकरी व ग्रामपंचायत संघटना गावकऱ्यांच्या पुढाकाराने ब्लिचिंग पावडरची खरेदी करते. गत आठ वर्षांपासून राजापूर ग्रामपंचायतने या ब्लिचिंग पावडर पुरवठ्याची मागणी करूनही पावसाळ्यापूर्वी ब्लिचिंग पावडर वेळेवर दिले नाही. पुनर्वसन गावात शुध्द पाणी पुरवठा होत नसल्याने पंचायत समिती विभागाने या पुनर्वसन गावात मुलभूत सोई सुविधा पुरवाव्या, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजाराला पुनर्वसन गावातील सदोष पाणी पुरवठ्याची जागोजागी फुटलेली पाईपलाईन सांडपाण्याने वाहून जाण्यासाठी नाल्याच नसल्याने पावसाळ्यात पुनर्वसन गावाचा आरोग्याचा प्रश्न दरवर्षी गंभीर होतो. गत आठ ते दहा वर्षांपासून आर्वी तालुक्यातील या पुनर्वसन गावांचे प्रश्न सदोष पाणीपुरवठा योजना व सांडपाण्याचे योग्य नियोजन केले नसल्याने दरवर्षी गंभीर होत आहे. यावर पुनर्वसन विभागाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांची आहे.(तालुका प्रतिनिधी) गावात ब्लिचिंग पावडरचा पुरवठा अनियमीत होतो. पिण्याच्या पाण्याची टाकी धुतल्याच जात नाही. पाणी पुरवठ्याची पाईप लाईन जागोजागी फुटली आहे. - निखील कडू, उपसरपंच, सर्कसपूर, ता. आर्वी. राजापूर गावात गत आठ-दहा वर्षांपासून ब्लिचिंग पावडरचा पुरवठाच होत नाही. आम्ही गावकरी बाजारातून अधिक भावाने ब्लिचिंग पावडर खरेदी करतो. संबंधीत पुनर्वसन विभागाला वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. - प्रा. धमेंद्र राऊत, अध्यक्ष सरपंच संघटना, वर्धा