शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पुनर्वसन झाले; पण मूलभूत सुविधाच नाही

By admin | Updated: December 29, 2014 23:49 IST

प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़

वर्धा : प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़ गावाचे पुनर्वसन तर केले; पण ग्रामस्थांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले़ यामुळे त्यांना खितपत जगावे लागत आहे़वर्धा जिल्ह्यात अनेक पुनर्वसित गावांबाबत हा प्रकार घडत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी का द्यायच्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कारंजा (घा़) तालुक्यातील मासोद येथे समस्यांनी कळस गाठला आहे़ पुनर्वसनाला २८ वर्षांचा कालावधी लोटला; पण अद्याप गावात रस्ते पोहोचले नाहीत़ नाल्या, पथदिव्यांची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही़ आर्वी तालुक्यातील महाकाळी येथे १९८६ मध्ये जलायशाची निर्मिती झाली़ या प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मासोद गावाला त्रास होता़ यामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात आले़ खरांगणा (मो़) ते कारंजा-कोंढाळी मार्गावरील मुख्य गाव असलेल्या मासोदची लोकसंख्या १३०० च्या आसपास असून घरांची संख्या २०० वर आहे़ पुनर्वसित गाव असल्याने येथे सोयी, सुविधा असतील, असा समज होतो; पण तेथे सुविधांचा दुष्काळच दिसतो़ गावातील मुख्य रस्त्यावर असलेले खड्डे रस्त्यांच्या स्थितीचे दर्शन घडवितो़ मासोद येथील घरांपुढे नाल्यांचे बांधकाम केले नाही़ यामुळे पावसाळ्यात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो़ बसस्थानक ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत़ गावातील अंतर्गत रस्ते कच्चे असून पावसाळ्यात ये-जा करताना चिखल तुडवावा लागतो़ नाल्या नसल्याने डबके साचते़ परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ गावात पथदिवे नसल्याने काळोखात चाचपडावे लागते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत मासोद येथे मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)