शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

पुनर्वसन झाले; पण मूलभूत सुविधाच नाही

By admin | Updated: December 29, 2014 23:49 IST

प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़

वर्धा : प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़ गावाचे पुनर्वसन तर केले; पण ग्रामस्थांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले़ यामुळे त्यांना खितपत जगावे लागत आहे़वर्धा जिल्ह्यात अनेक पुनर्वसित गावांबाबत हा प्रकार घडत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी का द्यायच्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कारंजा (घा़) तालुक्यातील मासोद येथे समस्यांनी कळस गाठला आहे़ पुनर्वसनाला २८ वर्षांचा कालावधी लोटला; पण अद्याप गावात रस्ते पोहोचले नाहीत़ नाल्या, पथदिव्यांची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही़ आर्वी तालुक्यातील महाकाळी येथे १९८६ मध्ये जलायशाची निर्मिती झाली़ या प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मासोद गावाला त्रास होता़ यामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात आले़ खरांगणा (मो़) ते कारंजा-कोंढाळी मार्गावरील मुख्य गाव असलेल्या मासोदची लोकसंख्या १३०० च्या आसपास असून घरांची संख्या २०० वर आहे़ पुनर्वसित गाव असल्याने येथे सोयी, सुविधा असतील, असा समज होतो; पण तेथे सुविधांचा दुष्काळच दिसतो़ गावातील मुख्य रस्त्यावर असलेले खड्डे रस्त्यांच्या स्थितीचे दर्शन घडवितो़ मासोद येथील घरांपुढे नाल्यांचे बांधकाम केले नाही़ यामुळे पावसाळ्यात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो़ बसस्थानक ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत़ गावातील अंतर्गत रस्ते कच्चे असून पावसाळ्यात ये-जा करताना चिखल तुडवावा लागतो़ नाल्या नसल्याने डबके साचते़ परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ गावात पथदिवे नसल्याने काळोखात चाचपडावे लागते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत मासोद येथे मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)