शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुनर्वसन झाले; पण मूलभूत सुविधाच नाही

By admin | Updated: December 29, 2014 23:49 IST

प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़

वर्धा : प्रकल्पांकरिता जमिनी संपादित करताना ग्रामस्थांना बेघर व भूमिहीन केले जाते; पण त्यांच्या सोयी, सुविधांकडे लक्ष दिले जात नाही़ असाच प्रकार कारंजा तालुक्यातील मासोद या गावाबाबत घडत आहे़ गावाचे पुनर्वसन तर केले; पण ग्रामस्थांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले़ यामुळे त्यांना खितपत जगावे लागत आहे़वर्धा जिल्ह्यात अनेक पुनर्वसित गावांबाबत हा प्रकार घडत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी शासनाला जमिनी का द्यायच्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कारंजा (घा़) तालुक्यातील मासोद येथे समस्यांनी कळस गाठला आहे़ पुनर्वसनाला २८ वर्षांचा कालावधी लोटला; पण अद्याप गावात रस्ते पोहोचले नाहीत़ नाल्या, पथदिव्यांची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही़ आर्वी तालुक्यातील महाकाळी येथे १९८६ मध्ये जलायशाची निर्मिती झाली़ या प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा मासोद गावाला त्रास होता़ यामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात आले़ खरांगणा (मो़) ते कारंजा-कोंढाळी मार्गावरील मुख्य गाव असलेल्या मासोदची लोकसंख्या १३०० च्या आसपास असून घरांची संख्या २०० वर आहे़ पुनर्वसित गाव असल्याने येथे सोयी, सुविधा असतील, असा समज होतो; पण तेथे सुविधांचा दुष्काळच दिसतो़ गावातील मुख्य रस्त्यावर असलेले खड्डे रस्त्यांच्या स्थितीचे दर्शन घडवितो़ मासोद येथील घरांपुढे नाल्यांचे बांधकाम केले नाही़ यामुळे पावसाळ्यात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो़ बसस्थानक ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत़ गावातील अंतर्गत रस्ते कच्चे असून पावसाळ्यात ये-जा करताना चिखल तुडवावा लागतो़ नाल्या नसल्याने डबके साचते़ परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ गावात पथदिवे नसल्याने काळोखात चाचपडावे लागते़ संबंधित विभागाने याकडे लक्ष देत मासोद येथे मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)