शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

भोगवटा प्रमाणपत्र असेल तरच विक्रीपत्राची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

प्रकल्प महारेराच्या टप्प्यात येत नसेल, तर या प्रकल्पाला किमान भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच विक्रीपत्राची नोंदणी करता येईल. नोंदणीदरम्यान देण्यात आलेली माहिती आणि प्रकल्पाची नोंदणी महारेरामध्ये आहे अथवा नाही, याची तपासणी निबंधक कार्यालयाला करावी लागेल.

ठळक मुद्देशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : फसवणुकीच्या घटनांना लगाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रकल्पाची नोंदणी महारेरामध्ये केली असेल आणि भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) मिळाले असेल तरच मालमत्ता विक्रीपत्राची नोंदणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने निबंधक आणि उपनिबंधकांना दिले आहेत. यामुळे आता घराचे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच विक्रीपत्र होणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.प्रकल्प महारेराच्या टप्प्यात येत नसेल, तर या प्रकल्पाला किमान भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच विक्रीपत्राची नोंदणी करता येईल. नोंदणीदरम्यान देण्यात आलेली माहिती आणि प्रकल्पाची नोंदणी महारेरामध्ये आहे अथवा नाही, याची तपासणी निबंधक कार्यालयाला करावी लागेल. हा नियम केवळ फ्लॅटपर्यंतच मर्यादित नसून भूखंडाकरिताही लागू करण्यात आला आहे. महारेरामध्ये नोंदणी केलेले भूखंड विकणे आता अवघड बाब झाली आहे.राज्य शासनाने जारी केलेल्या सूचनेत नोंदणीसंदर्भात अनेक बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. प्रकल्पाची महारेरामध्ये नोंदणी नसेल, तर त्या प्रकल्पाचा प्रचार-प्रसार, जाहिराती, विक्री अथवा कोणत्याही प्रकारचा उपक्रम कंपनी, भूविकासक, बिल्डर्स यांना राबविता येणार नाही. एखाद्याला अशा प्रकल्पाचा करार करता येईल मात्र नोंदणी करता येणार नाही.प्रकल्प केव्हापूर्ण होईल, याची माहिती बिल्डरला महारेरामध्येी नोंदणी करताना द्यावी लागते. त्यामुळे बिल्डरांवर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे बंधन आले आहे. यामध्ये दंडाच्या कठोर तरतुदी आहेत.महारेरापूर्वी अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू राहायचे आणि ग्राहकांना वाट पाहून आर्थिक फटका सहन करावा लागत होता. शासन निर्णयामुळे प्रॉपर्टी बाजारात पारदर्शकता आणि सुस्पष्टता येणार आहे. यात गुंतवणूक करणारेही सुरक्षित राहतील आणि ग्राहकांच्या पैशाचा दुरुपयोग होणार नाही.जिल्ह्यात भूखंडाचे श्रीखंड खाणारी टोळी सक्रियसर्वाधिक फसवणूक ही भूखंड विक्रीतून होते. जिल्ह्यात भूखंडांचे श्रीखंड खाणारी टोळीच सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. ले-आउट विकसित न करता केवळ चुन्याने आखणी करून भूखंडांची विक्री केली जात होती. एक भूखंडाची दोन ते तीन जणांना विक्री केली जाते. भूखंडाच्या किमतीपेक्षा दुप्पट विकासशुल्क भरावे लागत होते. महारेरा नोंदणी आणि शासनाच्या अधिसूचनेमुळे अशा प्रकारांना आता आळा बसणार आहे.अनेकांकडे नाही ‘ओसी’जिल्ह्यात पाचशेवर भूविकासक, बिल्डर्स आहेत. यातील बहुतांश व्यावसायिकांकडे आॅक्युपन्सी सर्टिफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र नाही. असे असताना नगररचना विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असलेल्या साटेलोट्यातून त्यांच्याकडून सर्रास भूखंड, फ्लॅट विक्री सुरू आहे. यात ग्राहकांचीच फसवणूक होत आहे.

टॅग्स :saleविक्री