शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केवळ ८२२ शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:11 IST

गत खरीपात तुरीने शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. यात शासनाने शासकीय खरेदी सुरू केली; मात्र अनियोजनामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. यंदाच्या हंगामात तसे होवू नये म्हणून गत हंगामात घेतलेला निर्णय शासनाने कायम ठेवत शेतकऱ्यांना पहिलेच आॅनलाईन नोंदी करण्याच्या सूचना केल्या.

ठळक मुद्दे नाफेडचा मुहूर्त नाही : शासकीय तूर खरेदीकडे शेतकरी पाठ फिरविण्याचे संकेत

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत खरीपात तुरीने शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. यात शासनाने शासकीय खरेदी सुरू केली; मात्र अनियोजनामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली. यंदाच्या हंगामात तसे होवू नये म्हणून गत हंगामात घेतलेला निर्णय शासनाने कायम ठेवत शेतकऱ्यांना पहिलेच आॅनलाईन नोंदी करण्याच्या सूचना केल्या. शासकीय दराकरिता शेतकऱ्यांना ही नोंद आवश्यक असताना त्यांच्याकडून याकडे पाठ केली जात असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यात आतापर्यंत केवळ ८२२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचे समोर आले आहे.शेतकऱ्यांकडून तुरीची कापणी करून ती काढत बाजारात आणणे सुरू झाले आहे. वर्धा बाजारात आतापर्यंत ४०० क्ंिवटल नवीन तूर आल्याचे सांगण्यात आले. या तुरीला ४ हजार ६०० रुपयांचा दर मिळत असून शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा अशी आशा आहे. या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा नाफेडच्या खरेदीकडे लागल्या असताना त्यांच्याकडून अद्याप खरेदी संदर्भात निर्णय घेण्यात आलेना नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे समोर येत असून नाफेडचे केंद्र सुरू करावे अशी मागणी आहे.यंदाच्या हंगामात कापूस उत्पादकांना बोंडअळीने आर्थिक अडचणीत आणल्याने त्यांना तुरीपासून काही लाभ होईल असे वाटत होते. या आशेत असतानाच ऐन हिवाळ्यात तुरीचे पीक वाळल्याने यंदा तुरीचे उत्पन्न होईल अशी चिन्हे नाहीत. यातही मिळणाऱ्या दरामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाचा दर ५ हजार ४०० रुपये असताना बाजारात ४ हजार ६०० रुपये व्यापारी देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शासनाची खरेदी सुरू नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासनाने वेळीच तुरीची खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.हिंगणघाट व आष्टीत नाफेड खरेदी नाहीजिल्ह्यातच नाही तर विदर्भात लौकीक असलेल्या हिंगणघाट बाजार समितीत नाफेडने खरेदी केंद्र नाकारले आहे. या सोबतच आष्टी बाजारातही नाफेडचे केंद्र नसल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.पी. आपदेव यांनी दिली. हिंगणघाट बाजारात भावाच्या आशेने शेतकऱ्यांची आवक मोठी आहे. या समितीत जर शासकीय खरेदी केंद्र नसले तर या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात नाफेडने खरेदी सुरू होण्यापुर्वीच या भागात केंद्राची मागणी शेतकरी करीत आहेत.तूर खरेदीबाबत नाफेडचा अद्याप निर्णय नाहीनवीन तूर बाजारात येत आहे. शिवाय व्यापाऱ्यांकडून मिळत असलेला दरही अत्यल्प आहे. यामुळे शासनाच्यावतीने नाफेडची खरेदी सुरू करणे आता अपेक्षित आहे. शासकीय खरेदी सुरू होताच शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याची अपेक्षा राहील व यातूनच व्यापारी त्यांचे भाव वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.नोंदणीकरिता बाजार समितीत केंद्रशासनाने गत हंगामापासून खरेदी आॅनलाईन केल्याने शेतकऱ्यांना नोंदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. नाफेडच्या खरेदी केंद्रावर तसेच प्रयेक बाजार आणि उपबाजार समितीत पणन महामंडळाच्यावतीने केंद्र सुरू करून शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केली आहे. असे असले तरी तुलनेत शेतकºयांनी नोंदी करण्याकडे पाठ केल्याचे दिसत आहे.