शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

अनुदानित बियाणांकरिता नोंदणी तर केली; पण महाबीजकडे बियाणेच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 11:18 IST

ही परिस्थिती एकट्या वर्धा जिल्ह्याची नसून राज्यातील इतरही जिल्ह्यांची असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्देऐन हंगामात शेतकऱ्यांना हुलकावणी वेळ अन् पैसाही गेल्याने सोयाबीन उत्पादकांचा हिरमोड

चिकणी(जामनी)/ वर्धा : अनुदानावर सोयाबीनचे बियाणे मिळावे याकरिता शेतकऱ्यांनी महाडीबीटी या शासकीय पोर्टलवर अधिकृत नोंदणी केली. परंतु आता ऐन पेरणीच्या तोंडावर महाबीजकडे साेयाबीनचे बियाणेच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. ही परिस्थिती एकट्या वर्धा जिल्ह्याची नसून राज्यातील इतरही जिल्ह्यांची असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

जिल्हा कृषी विभागाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी महाडीबीटी या शासकीय पोर्टलवर महिनाभरापूर्वी सोयाबीन प्रात्यक्षिक पीक लागवडीकरिता अनुदानित सोयाबीन बियाणांची नोंदणी केली. तसेच ५० टक्के अनुदानावर महाबीजचे बियाणे मिळण्यासाठी अर्जही केला. आता पेरणीची लगबग सुरू झाली असताना कृषी विभागाकडून महाबीजकडे अनुदानित सोयाबीनचे बियाणेच नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होणार नाही, असे सांगत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाया गेल्याने कृषी विभागाच्या या भोंगळ कारभाराप्रती रोष व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन करण्यापूर्वी महाबीजकडे पेरणीयोग्य बियाणांचा किती साठा उपलब्ध आहे, याची माहिती घेणे गरजेचे होते. परंतु तसे न करता शेतकऱ्यांना थेट ऑनलाइन नोंदणीचे आवाहन केले. कृषी विभागाची हीच चूक आता अंगलट आली असून यामध्ये शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे.

कृषी विभागाने चुकीचे प्रायश्चित्त म्हणून खुल्या बाजारातून जे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले, त्यापैकी जितक्या बियाणांकरिता नोंद केली होती, तितक्या बियाणांच्या खरेदीवर ५० टक्के अनुदानाची रक्कम कृषी कार्यालयाकडून देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

- गोपाल दुधाने, शेतकरी पढेगाव

महाबीजकडे बियाणे उपलब्ध नसल्याची समस्या संपूर्ण महाराष्ट्राची आहे. त्याकरिता इतर पर्याय उपलब्ध आहेत. त्याची माहिती शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून घ्यावी. तसेच राज्य पुरस्कृत सोयाबीन योजनेत प्रात्यक्षिकांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व त्याकरिता अर्ज केलेल्या आणि लॉटरीत निवड झालेल्या शेतकऱ्यांकडे घरचे १० वर्षाच्या आतील प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित सोयाबीन असेल तर ते बियाणे म्हणून वापरल्यास त्यावर अनुदान देता येईल.

- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा

पोर्टलच्या माध्यमातून गोळा केलेली रक्कम परत करा

महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी योजना शीर्षकांतर्गत बियाणे घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. अनुदानित सोयाबीनकरिता असंख्य शेतकऱ्यांनी अर्ज केले असून एका शेतकऱ्याला अडीचशे रुपयांचा खर्च आला आहे. यातून शासनाने राज्यभरात कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत; मात्र आता पेरणीच्या तोंडावर महाबीजकडे बियाणेच नसल्याचे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा फसव्या योजनांची प्रतीक्षा न करता बाजारातून बियाणे खरेदी करून पेरणी करावी आणि शासनाने तातडीने शेतकऱ्यांचे पैसे परत करावे. तसेच कृषी विभागातून फसव्या योजना राबविणाऱ्या कृषिमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहणा येथील युवा शेतकरी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र