शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

सामूहिक रजेतून शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:51 IST

विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी एकत्र येऊन बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले.

ठळक मुद्देमहसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन : जिल्हा कचेरीसमोर ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत शासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने भरण्यात यावी. पुरवठ्यातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपिकांना तदर्थ पदोन्नती देण्यात यावी. नागपूर विभागातील महसूल कर्मचाºयांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी भरण्यात यावी. पदोन्नत नायब तहसीलदारांना नियमीत पदांचा कार्यभार देण्यात यावा. सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबत ते कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणाहून मागविण्यात येणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी रेटल्या. आंदोलनकर्त्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्त्व महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मानेकर, सरचिटणीस अजय धर्माधिकारी यांनी केले. आंदोलनात अतुल रासपायले, पुनम मडावी, रेणूका रासपायले, रंजना मरघडे, अतुल जाधव, विलास बढे, पुनम वाळूकर, संजय भगत, अभय पवनारकर, अजय लाडे, पद्माकर वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.मागण्यांवर विचार न झाल्यास आजपासून लेखणीबंद आंदोलनमहसूल विभागातील कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ निर्णय न घेतल्यास लेखणीबंद आंदोलन ११ जुलैपासून करण्यात येणार आहे. याही आंदोलनाची दखल न घेतल्या गेल्यास १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :Governmentसरकार