शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

भारनियमनासह दुरूस्तीच्या कामांचाही सिंचनामध्ये खोडा

By admin | Updated: September 7, 2016 01:08 IST

पावसाच्या दडीमुळे पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून

शेतकऱ्यांची व्यथा : पाणी आणि ओलिताची सोय असताना पिकांवर येतेय अवकळारोहणा : पावसाच्या दडीमुळे पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून ओलिताला सुरूवात केली आहे; पण सिंचनाच्या प्रयत्नात भारनियमनाच्या वेळेसह दुरूस्तीसाठी कित्येक तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाकडून मागेल त्याला वीज, मंगळवारपासून शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा मिळणार, अशा कितीही घोषणा ऐकायला मिळत असल्या तरी विद्युत पुरवठ्याबाबतची वस्तुस्थिती विपरित असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. रोहणा परिसरात आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवारी रात्री १२ ते सकाळी ९.४५ पर्यंत थ्रीफेज विद्युत पुरवठा असतो. उर्वरित दिवसांत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ या काळात विद्युत पुरवठा असतो. इतर वेळी भारनियमन केले जाते भारनियमनाच्या वेळा सोडून इतरवेळी विद्युत पुरवठा नियमितपणे व्हावा, अशी शेतकऱ्यांनी रास्त व निकडपूर्ण अपेक्षा आहे; पण भारनियमन नसलेल्या वेळेतही विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने रोहणा परिसरातील ओलित करण्यास इच्छुक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रात्री विद्युत पुरवठा चालू असला तरी वन्य प्राण्यांच्या हिंसक स्वभावामुळे व सुरक्षेच्या दृष्टीने रात्री कुठलाही शेतकरी ओलित करू शकत नाही. या तीन दिवसांत खऱ्या अर्थाने सकाळी ६ ते ९.४५ याच काळात शेतकरी ओलित करतात. भारनियमनाशिवाय इतर वेळीही विद्युत पुरवठा होत नसल्याने ओलितावर विपरित परिणाम होत आहे. किमान नियोजित भारनियमन नसलेल्या वेळेत नियमित व दोषरहित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी ओलित करणारे शेतकरी करीत आहेत. सध्या रोहणा येथे कनिष्ठ अभियंता म्हणून दातीर कार्यरत आहेत. ते स्वत: शेतकरी पुत्र आहेत. शेतकऱ्यांना नियमितपणे विद्युत पुरवठा व्हावा या मानसिकतेचे आहेत. तसा त्यांचा प्रयत्नही असतो; पण कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रत्येक डिपीवर विद्युत पंपाच्या वाढत्या संख्येचे लोड व विद्युतच्या नवीन साहित्यातील कमी टिकावुपणा यामुळे वारंवार होणारे बिघाड तसेच भार वाहून नेणाऱ्या लोंबकळणाऱ्या तारा आणि झाडा-झुडूपातून जाणाऱ्या तारांमुळे विद्युत पुरवठ्यात बिघाड येतो. परिणामी, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो, अशी त्यांची खंत आहे. बिघाडाची दुरूस्ती भारनियमनाच्या वेळेत करता येऊ शकत नाही. ती विद्युत पुरवठा सुरू असतानाच खंडित ठेवून करावा लागतो. ती त्या कार्यालय प्रशासनाची मर्यादा असल्याचे सांगण्यात आले. कारणे काहीही असली तरी शेतकऱ्यांना खंडित विद्युत पुरवठा ओलितदार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ६ सप्टेंबरपासून विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांना दररोज १२ तास विद्युत पुरवठा देणार, अशी घोषणा करण्यात आली होती. किमान त्या घोषणेची अंमलबजावणी तरी महावितरणने करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)