शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

भारनियमनासह दुरूस्तीच्या कामांचाही सिंचनामध्ये खोडा

By admin | Updated: September 7, 2016 01:08 IST

पावसाच्या दडीमुळे पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून

शेतकऱ्यांची व्यथा : पाणी आणि ओलिताची सोय असताना पिकांवर येतेय अवकळारोहणा : पावसाच्या दडीमुळे पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून ओलिताला सुरूवात केली आहे; पण सिंचनाच्या प्रयत्नात भारनियमनाच्या वेळेसह दुरूस्तीसाठी कित्येक तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाकडून मागेल त्याला वीज, मंगळवारपासून शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा मिळणार, अशा कितीही घोषणा ऐकायला मिळत असल्या तरी विद्युत पुरवठ्याबाबतची वस्तुस्थिती विपरित असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. रोहणा परिसरात आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवारी रात्री १२ ते सकाळी ९.४५ पर्यंत थ्रीफेज विद्युत पुरवठा असतो. उर्वरित दिवसांत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ या काळात विद्युत पुरवठा असतो. इतर वेळी भारनियमन केले जाते भारनियमनाच्या वेळा सोडून इतरवेळी विद्युत पुरवठा नियमितपणे व्हावा, अशी शेतकऱ्यांनी रास्त व निकडपूर्ण अपेक्षा आहे; पण भारनियमन नसलेल्या वेळेतही विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने रोहणा परिसरातील ओलित करण्यास इच्छुक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रात्री विद्युत पुरवठा चालू असला तरी वन्य प्राण्यांच्या हिंसक स्वभावामुळे व सुरक्षेच्या दृष्टीने रात्री कुठलाही शेतकरी ओलित करू शकत नाही. या तीन दिवसांत खऱ्या अर्थाने सकाळी ६ ते ९.४५ याच काळात शेतकरी ओलित करतात. भारनियमनाशिवाय इतर वेळीही विद्युत पुरवठा होत नसल्याने ओलितावर विपरित परिणाम होत आहे. किमान नियोजित भारनियमन नसलेल्या वेळेत नियमित व दोषरहित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी ओलित करणारे शेतकरी करीत आहेत. सध्या रोहणा येथे कनिष्ठ अभियंता म्हणून दातीर कार्यरत आहेत. ते स्वत: शेतकरी पुत्र आहेत. शेतकऱ्यांना नियमितपणे विद्युत पुरवठा व्हावा या मानसिकतेचे आहेत. तसा त्यांचा प्रयत्नही असतो; पण कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रत्येक डिपीवर विद्युत पंपाच्या वाढत्या संख्येचे लोड व विद्युतच्या नवीन साहित्यातील कमी टिकावुपणा यामुळे वारंवार होणारे बिघाड तसेच भार वाहून नेणाऱ्या लोंबकळणाऱ्या तारा आणि झाडा-झुडूपातून जाणाऱ्या तारांमुळे विद्युत पुरवठ्यात बिघाड येतो. परिणामी, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो, अशी त्यांची खंत आहे. बिघाडाची दुरूस्ती भारनियमनाच्या वेळेत करता येऊ शकत नाही. ती विद्युत पुरवठा सुरू असतानाच खंडित ठेवून करावा लागतो. ती त्या कार्यालय प्रशासनाची मर्यादा असल्याचे सांगण्यात आले. कारणे काहीही असली तरी शेतकऱ्यांना खंडित विद्युत पुरवठा ओलितदार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ६ सप्टेंबरपासून विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांना दररोज १२ तास विद्युत पुरवठा देणार, अशी घोषणा करण्यात आली होती. किमान त्या घोषणेची अंमलबजावणी तरी महावितरणने करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)