शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

वृक्ष प्राधिकरणबाबत जिल्हा प्रशासन बेपर्वा

By admin | Updated: April 27, 2016 02:14 IST

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या संरक्षणाबाबत वर्धा जिल्हा चांगलाच बेपर्वा असल्याचे दिसून आले आहे.

धुऱ्याच्या आगीत झाडांची होरपळ : आठ वर्षांपासून समितीचे पुनर्गठन नाहीपराग मगर वर्धारस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या संरक्षणाबाबत वर्धा जिल्हा चांगलाच बेपर्वा असल्याचे दिसून आले आहे. या झाडांच्या संरक्षणाकरिता असलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीचे गत आठ वर्षांपासून गठनच झाले नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. झाडांबाबत प्रशासनाची उदासिनता एवढ्यावरच थांबली नाही तर या समितीबाबत पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या या समितीचे आठ वर्षांपूर्वी म्हणजेच सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेत गठन झाले होते. त्यानंतर या समितीचे कधी नूतनीकरणच झाले नाही. परिणामी जिल्ह्यात होत असलेल्या वृक्षतोडीकडे कुणाचे लक्ष नाही. झाडांच्या अस्तित्त्वाबाबत कोणीच गंभीर नाही. यामुळे वर्धेत ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश केवळ कागदावरच असल्याचे समोर येत आहे. वाढत्या तापमानापासून बचावाकरिता सर्वत्र वृक्षारोपणाचा संदेश देण्यात येतो. यावर अंमलबजावणी सुरू आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांकडून पेटविण्यात येत असलेल्या धुऱ्यांच्या आगीत मोठमोठी झाडे होरपळली जात आहे. याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेताच्या धुऱ्यावर अशी आग लावण्यावर प्रतिबंध घालण्याकरिता या समितीमार्फत काही ठोस नियम आखण्याची गरज आहे; मात्र जिल्ह्यात या समितीचे गठनच झाले नसल्याने जिल्ह्यात वृक्षलागवडीपेक्षा वृक्षतोडच अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात केवळ वर्धा नगरपरिषदेत मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी अशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती आहे. तीही निसर्ग सेवा समितीच्या पुढाकाराने अस्तित्त्वात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची उदासीनता प्रत्ययास येते. धुरा पेटविण्यात अनेक झाडांचा कोळसा उन्हाळवाही सुरू करताना शेतकरी त्यांच्या शेतात असलेला काडीकचरा पेटवितात. यात धुऱ्यावरील कचरा जाळण्याचीही पद्धत आहे. धुऱ्यावर लावण्यात आलेल्या आगीत अनेक मोठी वृक्ष जाळली जातात. यातील काही वृक्ष मुळातून पूर्णत: जळाली असून ती रस्त्यावर आडवी झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी वर्धा-नागपूर मार्गावर सेलू नजीक धुरा पेटविल्याने बुंध्यापासून जळालेले बाभळीचे झाड महामार्गावरच कोसळले. त्यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली. भर दुपारी हे झाड पडले. नेमक्या वेळी रस्त्यावर कुणी नसल्याने मोठा अपघात टळला. तसेच शुक्रवारी रात्री वर्धा पवनार मार्गावर एका शेतकऱ्याने धुरा पेटविल्याने संपूर्ण आग रस्त्यापर्यंत पोहोचली. धुरा पेटविताना पसरत गेलेल्या आगीतून अनेक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या कडेला बाभूळ, आंबा आणि कडुलिंब अशी झाडे आढळतात. यातील आंबा आणि बाभूळ ही झाडे लवकरच पेट घेणारी आहेत. त्यातच आंब्याचे झाडे हे आतून पोकळ असते. त्यामुळे ही दोन्ही झाडे पेटायला हलकीशी आसही पुरते. शेतकऱ्यांनी हा प्रकार टाळावा याकरिता व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त आहे.