शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वर्धेचे तापमान एक डिग्रीने कमी करण्यासाठी ‘महावृक्षारोपण’

By admin | Updated: May 27, 2017 00:27 IST

शहराचे तापमान प्रत्येक वर्षी डिग्रीने वाढत आहे. मानवाने नैसर्गिक प्रक्रियेत गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचे दुष्यपरिणाम

रविवारपासून प्रारंभ : प्रशासन व सामाजिक संघटनांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहराचे तापमान प्रत्येक वर्षी डिग्रीने वाढत आहे. मानवाने नैसर्गिक प्रक्रियेत गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचे दुष्यपरिणाम तापमान वाढीच्या स्वरूपातून दिसून येत आहे. निसर्गचक्र सुरळीत करण्यासाठी मानवालाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून वैद्यकीय जनजागृती मंच या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने महावृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता होणाऱ्या महाश्रमदानात वर्धेकरांनी सहभाग घेऊन शहराचे तापमान कमी करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. येत्या २८ मे रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत हनुमान टेकडी परिसरात महाश्रमदानाने उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. आर्वी तालुक्यात नुकतीच वॉटर कप स्पर्धा पार पडली. यात जिल्ह्यावासियांनी श्रमदान करून आपला सहभाग नोंदविला होता. त्यानुसार महावृक्षारोपण उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षारोपण व संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे. हनुमान टेकडी परिसरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही लोकोपयोगी मोहीम राबविण्यात आली आहे. यातून टेकडीवर १.५ कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण केले जाणार आहे. तसेच प्रशासनाकडून झालेल्या सर्व्हेक्षणात परिसरातील विहिरीच्या पातळी १.५ लिटर फुटांनी वाढ झाल्याची माहिती आहे. यासह टेकडी हिरवीगार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुर्वी व्हीजेएमने येथे ७१४ वृक्षांचे रोपण करून संवर्धन केले आहे. ही मोहीम आता विस्तारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या वाढत्या तापमानाचा नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शहराच्या वाढत्या तापमानाला नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शासनाने वैद्यकीय जनजागृती मंचच्या उपक्रमाची दखल घेत टेकडी परिसरात १० हजार रोपटे लावण्याचा निर्धार केला. यात जिल्हाधिकारी कार्यालयाचा सहभाग असणार आहे. येत्या रविवारी वनविभाग, वर्धा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वैद्यकीय जनजागृती मंच तसेच सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने १० हजार वृक्ष लावायचे आहे. वाढत्या तापमानाचा नियंत्रित ठेवणे आणि पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.