शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेचे तापमान एक डिग्रीने कमी करण्यासाठी ‘महावृक्षारोपण’

By admin | Updated: May 27, 2017 00:27 IST

शहराचे तापमान प्रत्येक वर्षी डिग्रीने वाढत आहे. मानवाने नैसर्गिक प्रक्रियेत गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचे दुष्यपरिणाम

रविवारपासून प्रारंभ : प्रशासन व सामाजिक संघटनांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहराचे तापमान प्रत्येक वर्षी डिग्रीने वाढत आहे. मानवाने नैसर्गिक प्रक्रियेत गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचे दुष्यपरिणाम तापमान वाढीच्या स्वरूपातून दिसून येत आहे. निसर्गचक्र सुरळीत करण्यासाठी मानवालाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून वैद्यकीय जनजागृती मंच या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने महावृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता होणाऱ्या महाश्रमदानात वर्धेकरांनी सहभाग घेऊन शहराचे तापमान कमी करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. येत्या २८ मे रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत हनुमान टेकडी परिसरात महाश्रमदानाने उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. आर्वी तालुक्यात नुकतीच वॉटर कप स्पर्धा पार पडली. यात जिल्ह्यावासियांनी श्रमदान करून आपला सहभाग नोंदविला होता. त्यानुसार महावृक्षारोपण उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षारोपण व संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे. हनुमान टेकडी परिसरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही लोकोपयोगी मोहीम राबविण्यात आली आहे. यातून टेकडीवर १.५ कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण केले जाणार आहे. तसेच प्रशासनाकडून झालेल्या सर्व्हेक्षणात परिसरातील विहिरीच्या पातळी १.५ लिटर फुटांनी वाढ झाल्याची माहिती आहे. यासह टेकडी हिरवीगार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुर्वी व्हीजेएमने येथे ७१४ वृक्षांचे रोपण करून संवर्धन केले आहे. ही मोहीम आता विस्तारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या वाढत्या तापमानाचा नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शहराच्या वाढत्या तापमानाला नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शासनाने वैद्यकीय जनजागृती मंचच्या उपक्रमाची दखल घेत टेकडी परिसरात १० हजार रोपटे लावण्याचा निर्धार केला. यात जिल्हाधिकारी कार्यालयाचा सहभाग असणार आहे. येत्या रविवारी वनविभाग, वर्धा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वैद्यकीय जनजागृती मंच तसेच सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने १० हजार वृक्ष लावायचे आहे. वाढत्या तापमानाचा नियंत्रित ठेवणे आणि पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.