शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

वर्धेचे तापमान एक डिग्रीने कमी करण्यासाठी ‘महावृक्षारोपण’

By admin | Updated: May 27, 2017 00:27 IST

शहराचे तापमान प्रत्येक वर्षी डिग्रीने वाढत आहे. मानवाने नैसर्गिक प्रक्रियेत गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचे दुष्यपरिणाम

रविवारपासून प्रारंभ : प्रशासन व सामाजिक संघटनांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहराचे तापमान प्रत्येक वर्षी डिग्रीने वाढत आहे. मानवाने नैसर्गिक प्रक्रियेत गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप केल्याचे दुष्यपरिणाम तापमान वाढीच्या स्वरूपातून दिसून येत आहे. निसर्गचक्र सुरळीत करण्यासाठी मानवालाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून वैद्यकीय जनजागृती मंच या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने महावृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता होणाऱ्या महाश्रमदानात वर्धेकरांनी सहभाग घेऊन शहराचे तापमान कमी करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. येत्या २८ मे रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत हनुमान टेकडी परिसरात महाश्रमदानाने उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. आर्वी तालुक्यात नुकतीच वॉटर कप स्पर्धा पार पडली. यात जिल्ह्यावासियांनी श्रमदान करून आपला सहभाग नोंदविला होता. त्यानुसार महावृक्षारोपण उपक्रमात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षारोपण व संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे. हनुमान टेकडी परिसरात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही लोकोपयोगी मोहीम राबविण्यात आली आहे. यातून टेकडीवर १.५ कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण केले जाणार आहे. तसेच प्रशासनाकडून झालेल्या सर्व्हेक्षणात परिसरातील विहिरीच्या पातळी १.५ लिटर फुटांनी वाढ झाल्याची माहिती आहे. यासह टेकडी हिरवीगार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुर्वी व्हीजेएमने येथे ७१४ वृक्षांचे रोपण करून संवर्धन केले आहे. ही मोहीम आता विस्तारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या वाढत्या तापमानाचा नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शहराच्या वाढत्या तापमानाला नियंत्रित ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. शासनाने वैद्यकीय जनजागृती मंचच्या उपक्रमाची दखल घेत टेकडी परिसरात १० हजार रोपटे लावण्याचा निर्धार केला. यात जिल्हाधिकारी कार्यालयाचा सहभाग असणार आहे. येत्या रविवारी वनविभाग, वर्धा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वैद्यकीय जनजागृती मंच तसेच सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने १० हजार वृक्ष लावायचे आहे. वाढत्या तापमानाचा नियंत्रित ठेवणे आणि पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.