शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

चौपदरीकरणाचे अंतर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:28 IST

नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षांना निवेदन : व्यापारी संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे. या रस्त्याची नियोजित ३० मिटरची लांबी २० मिटर करावी, अशी मागणी आर्वीतील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आर्वी-तळेगाव हा रस्ता राष्ट्रीय राज्य मार्गाकडे चारपदरी रस्ता बनविण्यासाठी हस्तांतरीत केला आहे. हा रस्ता आर्वीतील मुख्य रहदारीच्या ठिकाणाहून जात असल्याने आर्वी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने मोठ्या प्रमाणात तोडल्या जाण्याची शक्यता आहे. गत ५० वर्षांपासून हे दुकानदार लिजवर दिलेल्या जागेवर साहित्य विक्रीकरून कुटुंबाचे पालन पोषण करतात. त्यांची दुकाने हटविल्यास त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असून रस्त्याच्या चौपदरीकरण करताना ते २० मिटर इतकेच करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांना निवेदन सादर करताना यावेळी सुनील कटियारी डॉ. प्रकाश राठी, खलील भाई, मदन शिंदे, शेख जाबीर, सुनील खिलोसिया, विजू गहलोत, रवी निंबाळकर, मोटवानी आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. आर्वीतील शिवाजी चौकातून हा चौपदरीकरणाचा मार्ग जाणार असल्याने शहरातून हा मार्ग दोनपदरी करावा. तसेच आर्वी शहरातील लिजवर दिलेल्या दुकानांची मुदत २०३० पर्यंत असल्याने या मार्गावर चौपदरीकरण रस्त्याचे अंतर २० मिटर ठेवण्याची मागणी केली आहे.