शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

चौपदरीकरणाचे अंतर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:28 IST

नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षांना निवेदन : व्यापारी संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे. या रस्त्याची नियोजित ३० मिटरची लांबी २० मिटर करावी, अशी मागणी आर्वीतील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आर्वी-तळेगाव हा रस्ता राष्ट्रीय राज्य मार्गाकडे चारपदरी रस्ता बनविण्यासाठी हस्तांतरीत केला आहे. हा रस्ता आर्वीतील मुख्य रहदारीच्या ठिकाणाहून जात असल्याने आर्वी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने मोठ्या प्रमाणात तोडल्या जाण्याची शक्यता आहे. गत ५० वर्षांपासून हे दुकानदार लिजवर दिलेल्या जागेवर साहित्य विक्रीकरून कुटुंबाचे पालन पोषण करतात. त्यांची दुकाने हटविल्यास त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असून रस्त्याच्या चौपदरीकरण करताना ते २० मिटर इतकेच करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांना निवेदन सादर करताना यावेळी सुनील कटियारी डॉ. प्रकाश राठी, खलील भाई, मदन शिंदे, शेख जाबीर, सुनील खिलोसिया, विजू गहलोत, रवी निंबाळकर, मोटवानी आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. आर्वीतील शिवाजी चौकातून हा चौपदरीकरणाचा मार्ग जाणार असल्याने शहरातून हा मार्ग दोनपदरी करावा. तसेच आर्वी शहरातील लिजवर दिलेल्या दुकानांची मुदत २०३० पर्यंत असल्याने या मार्गावर चौपदरीकरण रस्त्याचे अंतर २० मिटर ठेवण्याची मागणी केली आहे.