शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

तहसीलदारांनी घर गाठत दिली शिधापत्रिका

By admin | Updated: October 10, 2015 02:39 IST

येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग याने नापिकीचे संकट व कर्जाचा वाढता भार यामुळे घरासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

‘त्या’ शेतकरी कुटुंबावर मदतीचा ओघ : वर्धेच्या युवकांनी दिला किराणा व धान्य वायगाव (निपाणी): येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग याने नापिकीचे संकट व कर्जाचा वाढता भार यामुळे घरासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर या शेतकऱ्याच्या कुटुंबाने दोन दिवस वरणाचे पाणी पिवून काढले. हे विदारक वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उजेडात आणताच त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. शुक्रवारी वर्धेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी शेतकऱ्याचे घर गाठत त्याला अंत्योदय योजनेत शिधापत्रिका दिली. तत्पूर्वी सकाळीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देत शेतकऱ्याच्या कुटुंबाला ११ हजार रुपयांची मदत केली. तर वर्धेतील काही युवकांनी या शेतकऱ्याचे घर गाठत किराणा व धान्याची मदत दिली. शिवाय वेळ प्रसंगी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. मक्त्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या नावे शेताचा सातबारा नसल्याने त्याला शासकीय मदत मिळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या घराकडे कुणीही फिरकले नाही. शिवाय या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना धान्यही मिळाले नव्हते. याची माहिती ‘लोकमत’च्या माध्यमातून मिळताच अधिकाऱ्यांसह काही समाजिक संघटनांनी या शेतकऱ्याच्या घराकडे धाव घेतली. यात तहसीलदार राहुल सारंग, नायब तहसीलदार प्रिती डुडूरकर यांनी शेतकऱ्याच्या घराला भेट देत अंत्योदय योजनेत शिधापत्रिका दिली. यावेळी सरपंच गणेश वांदाडे व जि.प. सदस्य मिना वाळके यांची उपस्थिती होती. कृषी विभागाचे मंडळ अधिकारी जवळेकर, शेळके व मेघे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत या कुटुंबाची विचारपूस केली. सोबतच त्यांनी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. ही रक्कम शेतकऱ्याच्या मुलीच्या स्वाधीन करण्यात आली.(वार्ताहर)