शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

तहसीलदारांनी घर गाठत दिली शिधापत्रिका

By admin | Updated: October 10, 2015 02:39 IST

येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग याने नापिकीचे संकट व कर्जाचा वाढता भार यामुळे घरासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

‘त्या’ शेतकरी कुटुंबावर मदतीचा ओघ : वर्धेच्या युवकांनी दिला किराणा व धान्य वायगाव (निपाणी): येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग याने नापिकीचे संकट व कर्जाचा वाढता भार यामुळे घरासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर या शेतकऱ्याच्या कुटुंबाने दोन दिवस वरणाचे पाणी पिवून काढले. हे विदारक वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उजेडात आणताच त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. शुक्रवारी वर्धेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी शेतकऱ्याचे घर गाठत त्याला अंत्योदय योजनेत शिधापत्रिका दिली. तत्पूर्वी सकाळीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देत शेतकऱ्याच्या कुटुंबाला ११ हजार रुपयांची मदत केली. तर वर्धेतील काही युवकांनी या शेतकऱ्याचे घर गाठत किराणा व धान्याची मदत दिली. शिवाय वेळ प्रसंगी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. मक्त्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या नावे शेताचा सातबारा नसल्याने त्याला शासकीय मदत मिळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या घराकडे कुणीही फिरकले नाही. शिवाय या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना धान्यही मिळाले नव्हते. याची माहिती ‘लोकमत’च्या माध्यमातून मिळताच अधिकाऱ्यांसह काही समाजिक संघटनांनी या शेतकऱ्याच्या घराकडे धाव घेतली. यात तहसीलदार राहुल सारंग, नायब तहसीलदार प्रिती डुडूरकर यांनी शेतकऱ्याच्या घराला भेट देत अंत्योदय योजनेत शिधापत्रिका दिली. यावेळी सरपंच गणेश वांदाडे व जि.प. सदस्य मिना वाळके यांची उपस्थिती होती. कृषी विभागाचे मंडळ अधिकारी जवळेकर, शेळके व मेघे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत या कुटुंबाची विचारपूस केली. सोबतच त्यांनी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. ही रक्कम शेतकऱ्याच्या मुलीच्या स्वाधीन करण्यात आली.(वार्ताहर)