शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

रासायनिक खतांच्या किमती भडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 14:04 IST

२०१९-२० चा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांची निर्र्मिती करणाऱ्या कंपन्यांनी शेतकरी वापरत असलेल्या अनुदानित खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत.

ठळक मुद्देकंपन्यांकडून भरघोस वाढ शेतीचा वाढेल उत्पादन खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २०१९-२० चा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांची निर्र्मिती करणाऱ्या कंपन्यांनी शेतकरी वापरत असलेल्या अनुदानित खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.खताबरोबरच मजुरी, विद्युत खर्च यावरही वाढणारा खर्च लक्षात घेता २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, ही शासनाची घोषणा दिवास्वप्नच ठरणार असे दिसते. शेतमालाचे भाव आहे तसेच आहेत. वाढले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होतो, असा दरवर्षीचा अनुभव असतो. शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा बाजारात त्याचे भाव हमीभावापेक्षा कमी असतात. शासनाची हमीभावाने खरेदी करण्याची व्यवस्था नसते. शेतकरी अधिक वेळ थांबू शकत नाही. परिणामी, मिळेल तो भाव घेऊन शेतकरी आपला माल विकतो. खतांबरोबरच मजुरीचे दरदेखील वाढत आहेत.वीज देयकाचे दर नुकतेच ६ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. एकीकडे शेतीवरील खर्चात वाढ होत आहे. म्हणजेच उत्पादन खर्च वाढत आहे. भाव ‘जैसे थे’ असल्याने उत्पन्न दरवर्षी घटत आहे. शासन २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायची भाषा करीत आहे. शासनाचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. खतांच्या दरवाढीवर शासनाने नियंत्रण आणावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अशी झाली दरवाढ रासायनिक खतांच्या किमतीत हंगामापूर्वीच १०० ते २५० रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. १०:२६:२६ खताची ५० किलोची बॅग १३२५ पर्यंत मिळायची. ती आता १३४० रूपयाला घ्यावी लागणार आहे. यात १०५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. डीएपीची बॅग १२९० रुपयांऐवजी १४०० रुपये किंमत झाल्याने ११० रूपयाने भाव वाढले आहेत. तर पोटॅशची बॅग ७०० रुपयांवरून थेट ९०० रुपये किंमतीवर गेली आहे. अन्य खतांच्या किमती देखील १०० ते २५० रूपयांनी वाढल्या आहे.

टॅग्स :agricultureशेती