शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

लव्हाळे, बेशरमच्या विळख्याने नदी पात्र धोक्यात

By admin | Updated: March 16, 2017 00:45 IST

भूजल पुनर्भरण तथा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात.

खोलीकरणाची मागणी : नदीचे पाणी दूषित वर्धा : भूजल पुनर्भरण तथा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केला जातो; पण मुख्य जलस्त्रोत असलेल्या नद्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश नद्यांचे पात्रच धोक्यात आल्याची स्थिती आहे. काही नद्यांची अतिरेकी रेती उपसा वाट लावत आहे तर काही नद्या लव्हाळे, बेशरम व वनस्पती वाढल्याने नाल्यात परिवर्तित होत असल्याचे दिसते. ही बाब गांभीर्याने घेणेच गरजेचे झाले आहे. वर्धा जिल्ह्यात वर्धा, वणा, यशोदा, बोर, धाम, बाकळी आदी नद्या वाहतात. या नद्यांचे जलस्त्रोत जिवंत ठेवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना जलपर्णीचा विळखा असल्याचे दिसते. परिणामी, नद्यांच्या पात्रांचे नाल्यात रूपांतर होत असल्याचे दिसते. नदीच्या पात्रामध्ये लव्हाळे वाढले असून बेशरमची झाडे वाढली आहेत. शिवाय विविध वनस्पती वाढल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. पाणी थांबल्याने ते बेशरम व वनस्पतीमुळे दूषित होऊन अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. प्रारंभी शासनाने नदी स्वच्छता अभियान हाती घेतले जाणार असल्याची घोषणा केली. धाम नदीच्या स्वच्छतेसाठी कार्यक्रमांचा घाटही घातला; पण हा प्रकार तेवढ्यावरच थांबला. यानंतर कुठेही नद्या स्वच्छ करण्यात आल्या नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)