शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

लव्हाळे, बेशरमच्या विळख्याने नदी पात्र धोक्यात

By admin | Updated: March 16, 2017 00:45 IST

भूजल पुनर्भरण तथा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात.

खोलीकरणाची मागणी : नदीचे पाणी दूषित वर्धा : भूजल पुनर्भरण तथा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केला जातो; पण मुख्य जलस्त्रोत असलेल्या नद्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश नद्यांचे पात्रच धोक्यात आल्याची स्थिती आहे. काही नद्यांची अतिरेकी रेती उपसा वाट लावत आहे तर काही नद्या लव्हाळे, बेशरम व वनस्पती वाढल्याने नाल्यात परिवर्तित होत असल्याचे दिसते. ही बाब गांभीर्याने घेणेच गरजेचे झाले आहे. वर्धा जिल्ह्यात वर्धा, वणा, यशोदा, बोर, धाम, बाकळी आदी नद्या वाहतात. या नद्यांचे जलस्त्रोत जिवंत ठेवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना जलपर्णीचा विळखा असल्याचे दिसते. परिणामी, नद्यांच्या पात्रांचे नाल्यात रूपांतर होत असल्याचे दिसते. नदीच्या पात्रामध्ये लव्हाळे वाढले असून बेशरमची झाडे वाढली आहेत. शिवाय विविध वनस्पती वाढल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. पाणी थांबल्याने ते बेशरम व वनस्पतीमुळे दूषित होऊन अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. प्रारंभी शासनाने नदी स्वच्छता अभियान हाती घेतले जाणार असल्याची घोषणा केली. धाम नदीच्या स्वच्छतेसाठी कार्यक्रमांचा घाटही घातला; पण हा प्रकार तेवढ्यावरच थांबला. यानंतर कुठेही नद्या स्वच्छ करण्यात आल्या नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)