शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

लव्हाळे, बेशरमच्या विळख्याने नदी पात्र धोक्यात

By admin | Updated: March 16, 2017 00:45 IST

भूजल पुनर्भरण तथा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात.

खोलीकरणाची मागणी : नदीचे पाणी दूषित वर्धा : भूजल पुनर्भरण तथा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केला जातो; पण मुख्य जलस्त्रोत असलेल्या नद्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश नद्यांचे पात्रच धोक्यात आल्याची स्थिती आहे. काही नद्यांची अतिरेकी रेती उपसा वाट लावत आहे तर काही नद्या लव्हाळे, बेशरम व वनस्पती वाढल्याने नाल्यात परिवर्तित होत असल्याचे दिसते. ही बाब गांभीर्याने घेणेच गरजेचे झाले आहे. वर्धा जिल्ह्यात वर्धा, वणा, यशोदा, बोर, धाम, बाकळी आदी नद्या वाहतात. या नद्यांचे जलस्त्रोत जिवंत ठेवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना जलपर्णीचा विळखा असल्याचे दिसते. परिणामी, नद्यांच्या पात्रांचे नाल्यात रूपांतर होत असल्याचे दिसते. नदीच्या पात्रामध्ये लव्हाळे वाढले असून बेशरमची झाडे वाढली आहेत. शिवाय विविध वनस्पती वाढल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. पाणी थांबल्याने ते बेशरम व वनस्पतीमुळे दूषित होऊन अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. प्रारंभी शासनाने नदी स्वच्छता अभियान हाती घेतले जाणार असल्याची घोषणा केली. धाम नदीच्या स्वच्छतेसाठी कार्यक्रमांचा घाटही घातला; पण हा प्रकार तेवढ्यावरच थांबला. यानंतर कुठेही नद्या स्वच्छ करण्यात आल्या नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)