शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

रापमच्या 263 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली नवीन पगारवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत रापमच्या जिल्ह्यातील पाच आगारातील आंदोलनकर्त्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे असे आवाहन रापमच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही आंदोलनकर्ते कर्मचारी आपल्या चार महत्त्वाच्या मागणींवर ठाम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विलीनीकरणासह पगारवाढ तसेच विविध मागण्यांसाठी दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात सुरूवातीस रापमच्या वर्धा विभागातील तब्बल १ हजार ४०३ कर्मचारी सहभागी झाले होते. पण नंतर पगारवाढ मान्य करीत तसेच विविध कारणांमुळे २६३ कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. असे असले तरी अजूनही १ हजार १०० कर्मचारी विलीनीकरणासाठी काम बंद आंदोलनात सहभागी होऊन लढा देत आहेत.उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत रापमच्या जिल्ह्यातील पाच आगारातील आंदोलनकर्त्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे असे आवाहन रापमच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही आंदोलनकर्ते कर्मचारी आपल्या चार महत्त्वाच्या मागणींवर ठाम आहेत. या आंदोलनामुळे रापमच्या बसेस आगारातच उभ्या असून रापमचे अर्थचक्रच थांबले आहे.

रापमची प्रवासी वाहतूक सुरू व्हावी

कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा बंदच आहे. इतकेच नव्हे तर कोविड काळात सुरू करण्यात आलेली मालवाहतूकही बंद आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेली रापमची प्रवासी वाहतूक सेवा लवकरात लवकर सुरू व्हायला हवी.- मुरलीधर नगराळे, प्रवासी.

विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आम्हाला ग्रामीण भागातून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या स्थळी यावे लागते. वृद्धांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी भाड्यात सवलत मिळते. पण सध्या बसेस बंद असल्याने जादा प्रवासी भाडे देऊन खासगी वाहनांनी ये-जा करावी लागत आहे. रापमची प्रवासी वाहतूक लवकर सुरू व्हायला पाहिजे.- सुभाष घायवट, शेतकरी.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप