शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रापमच्या 263 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली नवीन पगारवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत रापमच्या जिल्ह्यातील पाच आगारातील आंदोलनकर्त्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे असे आवाहन रापमच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही आंदोलनकर्ते कर्मचारी आपल्या चार महत्त्वाच्या मागणींवर ठाम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विलीनीकरणासह पगारवाढ तसेच विविध मागण्यांसाठी दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात सुरूवातीस रापमच्या वर्धा विभागातील तब्बल १ हजार ४०३ कर्मचारी सहभागी झाले होते. पण नंतर पगारवाढ मान्य करीत तसेच विविध कारणांमुळे २६३ कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. असे असले तरी अजूनही १ हजार १०० कर्मचारी विलीनीकरणासाठी काम बंद आंदोलनात सहभागी होऊन लढा देत आहेत.उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत रापमच्या जिल्ह्यातील पाच आगारातील आंदोलनकर्त्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे असे आवाहन रापमच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही आंदोलनकर्ते कर्मचारी आपल्या चार महत्त्वाच्या मागणींवर ठाम आहेत. या आंदोलनामुळे रापमच्या बसेस आगारातच उभ्या असून रापमचे अर्थचक्रच थांबले आहे.

रापमची प्रवासी वाहतूक सुरू व्हावी

कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा बंदच आहे. इतकेच नव्हे तर कोविड काळात सुरू करण्यात आलेली मालवाहतूकही बंद आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेली रापमची प्रवासी वाहतूक सेवा लवकरात लवकर सुरू व्हायला हवी.- मुरलीधर नगराळे, प्रवासी.

विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आम्हाला ग्रामीण भागातून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या स्थळी यावे लागते. वृद्धांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी भाड्यात सवलत मिळते. पण सध्या बसेस बंद असल्याने जादा प्रवासी भाडे देऊन खासगी वाहनांनी ये-जा करावी लागत आहे. रापमची प्रवासी वाहतूक लवकर सुरू व्हायला पाहिजे.- सुभाष घायवट, शेतकरी.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप