शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रापमच्या 263 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली नवीन पगारवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST

उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत रापमच्या जिल्ह्यातील पाच आगारातील आंदोलनकर्त्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे असे आवाहन रापमच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही आंदोलनकर्ते कर्मचारी आपल्या चार महत्त्वाच्या मागणींवर ठाम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विलीनीकरणासह पगारवाढ तसेच विविध मागण्यांसाठी दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात सुरूवातीस रापमच्या वर्धा विभागातील तब्बल १ हजार ४०३ कर्मचारी सहभागी झाले होते. पण नंतर पगारवाढ मान्य करीत तसेच विविध कारणांमुळे २६३ कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. असे असले तरी अजूनही १ हजार १०० कर्मचारी विलीनीकरणासाठी काम बंद आंदोलनात सहभागी होऊन लढा देत आहेत.उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत रापमच्या जिल्ह्यातील पाच आगारातील आंदोलनकर्त्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे असे आवाहन रापमच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही आंदोलनकर्ते कर्मचारी आपल्या चार महत्त्वाच्या मागणींवर ठाम आहेत. या आंदोलनामुळे रापमच्या बसेस आगारातच उभ्या असून रापमचे अर्थचक्रच थांबले आहे.

रापमची प्रवासी वाहतूक सुरू व्हावी

कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा बंदच आहे. इतकेच नव्हे तर कोविड काळात सुरू करण्यात आलेली मालवाहतूकही बंद आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेली रापमची प्रवासी वाहतूक सेवा लवकरात लवकर सुरू व्हायला हवी.- मुरलीधर नगराळे, प्रवासी.

विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आम्हाला ग्रामीण भागातून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या स्थळी यावे लागते. वृद्धांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी भाड्यात सवलत मिळते. पण सध्या बसेस बंद असल्याने जादा प्रवासी भाडे देऊन खासगी वाहनांनी ये-जा करावी लागत आहे. रापमची प्रवासी वाहतूक लवकर सुरू व्हायला पाहिजे.- सुभाष घायवट, शेतकरी.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप