शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

ऐन हंगामात रापमला 1.76 कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

दिवाळी उत्साहात साजरी केल्यावर ते आपल्या नियोजित ठिकाणी जात असल्याने या दिवसांत रापमला प्रवासीही जादा मिळतात. अनेक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला दुय्यम स्थान देऊन रापमच्या प्रवासी वाहतूक सुरक्षित आहे, असे म्हणत रापमच्या बसनेच ये-जा करतात; पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रापमच्या प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. बसेसच बंद असल्याने रापमला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी हा राज्य परिवहन महामंडळासाठी व्यावसायिक हंगामच असतो. पण ऐन दिवाळीपूर्वी रापमच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसल्याने आणि मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रामपच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने जिल्ह्यातील पाचही आगारांमध्ये बसेस उभ्या आहेत. परिणामी, आतापर्यंत रापमला १.७८ कोटींचा फटका बसला आहे.लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी परततात. दिवाळी उत्साहात साजरी केल्यावर ते आपल्या नियोजित ठिकाणी जात असल्याने या दिवसांत रापमला प्रवासीही जादा मिळतात. अनेक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला दुय्यम स्थान देऊन रापमच्या प्रवासी वाहतूक सुरक्षित आहे, असे म्हणत रापमच्या बसनेच ये-जा करतात; पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रापमच्या प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. बसेसच बंद असल्याने रापमला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

या मागण्यांसाठी सुरू आहे आंदोलन-    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे.-    राज्य परिवहन महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा.-    एसटी कामगारांना समान काम-समान दाम या तत्त्वावर किमान वेतन कायद्यानुसार १ एप्रिल २०१६ पासून १८ हजार रुपये मूळ वेतन देण्यात यावे.-    सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.

दररोज ८०० बस फेऱ्यांचे नियोजन-    जिल्ह्यातील रापमच्या पाच आगारांमध्ये एकूण २२० बसेस आहेत. या बसेसच्या जोरावर पाचही आगारांमधून दररोज सुमारे ८०० बस फेऱ्यांचे नियोजन केले जाते; पण कामबंद आंदोलनामुळे रापमचे हे सर्व नियोजन कोलमडले आहे.

मालवाहतुकीवरही परिणाम-    कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान रापमकडून मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. या मालवाहतुकीच्या माध्यमातून मोठी मिळकतही रापमला मिळत असली तरी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मालवाहतूक करणारी वाहनेही सध्या रापमच्या आगारांमध्ये उभ्या आहेत. एकूणच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रापमच्या मालवाहतुकीवरही परिणाम झाला आहे.दररोज २३ लाखांची मिळकत-    रापमच्या पाच आगारांमधून दररोज सुमारे ८०० बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत असून २२ लाखांची प्रतिदिवशी मिळकत होते. तर हंगामात ही मिळत किमान ३५ लाखांवर जात असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी मागील आठ दिवसांपासून रापमच्या वर्धा विभागाला कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे तोटाच सहन करावा लागत आहे.

रामपच्या वर्धा विभागाला दररोज २३ लाखांची मिळकत राहत असून हंगामात ती किमान २३ लाखांवर पोहोचते. पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने रापमला किमान १.७६ कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.- विजय घायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, रापम, वर्धा

 

टॅग्स :state transportएसटी