शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हंगामात रापमला 1.76 कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

दिवाळी उत्साहात साजरी केल्यावर ते आपल्या नियोजित ठिकाणी जात असल्याने या दिवसांत रापमला प्रवासीही जादा मिळतात. अनेक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला दुय्यम स्थान देऊन रापमच्या प्रवासी वाहतूक सुरक्षित आहे, असे म्हणत रापमच्या बसनेच ये-जा करतात; पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रापमच्या प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. बसेसच बंद असल्याने रापमला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी हा राज्य परिवहन महामंडळासाठी व्यावसायिक हंगामच असतो. पण ऐन दिवाळीपूर्वी रापमच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसल्याने आणि मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रामपच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने जिल्ह्यातील पाचही आगारांमध्ये बसेस उभ्या आहेत. परिणामी, आतापर्यंत रापमला १.७८ कोटींचा फटका बसला आहे.लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी परततात. दिवाळी उत्साहात साजरी केल्यावर ते आपल्या नियोजित ठिकाणी जात असल्याने या दिवसांत रापमला प्रवासीही जादा मिळतात. अनेक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला दुय्यम स्थान देऊन रापमच्या प्रवासी वाहतूक सुरक्षित आहे, असे म्हणत रापमच्या बसनेच ये-जा करतात; पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रापमच्या प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. बसेसच बंद असल्याने रापमला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

या मागण्यांसाठी सुरू आहे आंदोलन-    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे.-    राज्य परिवहन महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा.-    एसटी कामगारांना समान काम-समान दाम या तत्त्वावर किमान वेतन कायद्यानुसार १ एप्रिल २०१६ पासून १८ हजार रुपये मूळ वेतन देण्यात यावे.-    सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.

दररोज ८०० बस फेऱ्यांचे नियोजन-    जिल्ह्यातील रापमच्या पाच आगारांमध्ये एकूण २२० बसेस आहेत. या बसेसच्या जोरावर पाचही आगारांमधून दररोज सुमारे ८०० बस फेऱ्यांचे नियोजन केले जाते; पण कामबंद आंदोलनामुळे रापमचे हे सर्व नियोजन कोलमडले आहे.

मालवाहतुकीवरही परिणाम-    कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान रापमकडून मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. या मालवाहतुकीच्या माध्यमातून मोठी मिळकतही रापमला मिळत असली तरी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मालवाहतूक करणारी वाहनेही सध्या रापमच्या आगारांमध्ये उभ्या आहेत. एकूणच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रापमच्या मालवाहतुकीवरही परिणाम झाला आहे.दररोज २३ लाखांची मिळकत-    रापमच्या पाच आगारांमधून दररोज सुमारे ८०० बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत असून २२ लाखांची प्रतिदिवशी मिळकत होते. तर हंगामात ही मिळत किमान ३५ लाखांवर जात असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी मागील आठ दिवसांपासून रापमच्या वर्धा विभागाला कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे तोटाच सहन करावा लागत आहे.

रामपच्या वर्धा विभागाला दररोज २३ लाखांची मिळकत राहत असून हंगामात ती किमान २३ लाखांवर पोहोचते. पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने रापमला किमान १.७६ कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.- विजय घायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, रापम, वर्धा

 

टॅग्स :state transportएसटी