शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांनी केली डाळिंबाची बाग उद्ध्वस्त

By admin | Updated: August 15, 2016 01:10 IST

रानडुकरांनी शेतातील डाळींबाची बाग उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले.

दीड लाखाचे नुकसान : भरपाई देण्यास वनविभागाकडून टाळाटाळ समुद्रपूर : रानडुकरांनी शेतातील डाळींबाची बाग उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले. आधीच शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लाखो रूपये खर्च करून जगविलेली डाळींबाची बाग वन्यप्राण्यांनी नष्ट केल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिसरातील शेडगाव, दहेगाव, जाम, हिरडी, वडगाव, पारडा, मांगली, शिर्सी शिवारात रोही व डुकरांच्या कळपांनी हैदोस घातला आहे. वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत आहे. कुंपण लावून तयार केलेल्या बागाही उद्ध्वस्त होत आहे. वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्लेसुद्धा केले आहे. याबाबत शेतकरी वनविभागाकडे तक्रार घेऊन गेल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जाते आहे. शेतकरी मंगेश शंकरराव सुपारे यांनी नांदी फाउंडेशनच्या मदतीने दोन एकरांत डाळींबाची लागवड केली. यासाठी त्यांना आतापर्यंत प्रतीझाड चार ते पाच हजार रूपये खर्च आला. त्यातील ४० झाडे रानडुकरांनी मुळासह उपटून उद्ध्वस्त केली. याबाबत त्यांनी समुद्रपूर वनविभाग कार्यालयात तक्रार केली. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता तुम्ही नांदी फाउंडेशनकडून झाडांची लागवड केली, त्याचे प्रमाणपत्र आणा असे म्हनात परत पाठविले. शेतकऱ्याने प्रमाणपत्र नेल्यानंतर कागदपत्रांची गरज नव्हती, असे म्हणून आता चार ते पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे. तुमची तक्रार दाखल होऊ शकत नसल्याचे सांगत बोळवण केली. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यानंतरही वनविभाग दखल घेत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. शेतकरी सुपारे यांचे १ लाख ६० रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)