शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

रानडुकरांनी केली डाळिंबाची बाग उद्ध्वस्त

By admin | Updated: August 15, 2016 01:10 IST

रानडुकरांनी शेतातील डाळींबाची बाग उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले.

दीड लाखाचे नुकसान : भरपाई देण्यास वनविभागाकडून टाळाटाळ समुद्रपूर : रानडुकरांनी शेतातील डाळींबाची बाग उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले. आधीच शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लाखो रूपये खर्च करून जगविलेली डाळींबाची बाग वन्यप्राण्यांनी नष्ट केल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिसरातील शेडगाव, दहेगाव, जाम, हिरडी, वडगाव, पारडा, मांगली, शिर्सी शिवारात रोही व डुकरांच्या कळपांनी हैदोस घातला आहे. वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत आहे. कुंपण लावून तयार केलेल्या बागाही उद्ध्वस्त होत आहे. वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्लेसुद्धा केले आहे. याबाबत शेतकरी वनविभागाकडे तक्रार घेऊन गेल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जाते आहे. शेतकरी मंगेश शंकरराव सुपारे यांनी नांदी फाउंडेशनच्या मदतीने दोन एकरांत डाळींबाची लागवड केली. यासाठी त्यांना आतापर्यंत प्रतीझाड चार ते पाच हजार रूपये खर्च आला. त्यातील ४० झाडे रानडुकरांनी मुळासह उपटून उद्ध्वस्त केली. याबाबत त्यांनी समुद्रपूर वनविभाग कार्यालयात तक्रार केली. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता तुम्ही नांदी फाउंडेशनकडून झाडांची लागवड केली, त्याचे प्रमाणपत्र आणा असे म्हनात परत पाठविले. शेतकऱ्याने प्रमाणपत्र नेल्यानंतर कागदपत्रांची गरज नव्हती, असे म्हणून आता चार ते पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे. तुमची तक्रार दाखल होऊ शकत नसल्याचे सांगत बोळवण केली. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यानंतरही वनविभाग दखल घेत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. शेतकरी सुपारे यांचे १ लाख ६० रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)