शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रामपूर-वाई रस्ता चिखलात हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:22 IST

शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतीपयोगी साहित्य व त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता बांधापर्यंत वाहने पोहोचावी याकरिता शासनाने पांदण रस्ता योजना राबविली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे चांगल्या योजनेची कशी वाट लागली, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रामपूर ते पिपळधरी रस्ता.

ठळक मुद्देप्रशासनाला दुरुस्तीकरिता सापडेना मुहूर्त : शेतकऱ्यांना सोसाव्या लागताहेत मरणयातना

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतीपयोगी साहित्य व त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता बांधापर्यंत वाहने पोहोचावी याकरिता शासनाने पांदण रस्ता योजना राबविली; परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे चांगल्या योजनेची कशी वाट लागली, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रामपूर ते पिपळधरी रस्ता.ही दोन्ही गावे आदिवासीबहुल आहे. या रस्त्यालगत पिपळधरी, विरुळ, रामपूर येथील शेतकºयांची शेती आहे. हा रस्ता अत्यंत खडतर असल्यामुळे काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे माती टाकून बांधकाम करण्यात आले. काही दिवस हा रस्ता समांतर होऊ दिला; परंतु पाच वर्षांचा काळ लोटूनही संबंधित विभागाला या रस्त्यावर मुरुम टाकायचा मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे या रस्त्यावर केवळ माती असल्याने यंदाच्या पावसाने तब्बल दोन कि. मी. चा रस्ता सर्वत्र चिखलाने माखला. शेतकऱ्यांना मोठी कसरत करून बंडी बाजूला ठेवून डवरणीचे साहित्य डोक्यावर घेऊन चिखल तुडवत शेतात जावे लागते. खत-युरियाच्या थैल्या डोक्यावर न्याव्या लागत असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परीणाम होत आहे. रस्ता खराब असल्यामुळे या भागातील शेतात कुणी मजुरही यायला पाहत नाही. त्यामुळे अनेकांची शेती पडीत राहते. याच रस्त्यावरील नाल्यावर बांधलेला पूलही वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करीत त्वरित मुरूम टाकून वहिवाटीसाठी हा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक