शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

देशात राममंदिर बनलं, पण ‘साधराम’ असुरक्षितच! प्रवीण तोगडिया

By रवींद्र चांदेकर | Published: March 21, 2024 7:29 PM

हिंदूंच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत साधला संवाद

आनंद इंगोले, वर्धा: देशामध्ये सातत्याने हिंदूंवर अन्याय होत आहे. छत्तीसगडमधील कवरझा येथील ‘साधराम’ नामक हिंदू व्यक्तीचा गळा कापण्यात आला. असाच प्रकार इतरही राज्यात सुरू असून, आजही देशात हिंदू असुरक्षितच आहे. एकीकडे देशामध्ये राममंदिर बांधण्यात आले, पण 'साधराम' असुरक्षित आहे, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

एका बैठकीच्या निमित्ताने ते वर्धेत आले होते. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात यासह इतरही ठिकाणी हिंदूंची हत्या केली जात आहे. त्या रोखण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशात जिहादींची हिंमत वाढत असल्यामुळे हिंदूंना अन्यायाचा सामना करावा लागत आहे. सरकार कुणाचे आहे, हा प्रश्न नाही. भाजपाचे सरकार असो वा काँग्रेसचे सरकार असो, यात सरकार आपली भूमिका पार पाडत आहे. ते योग्य पावले उचलून कारवाई करीत आहे. या प्रकाराला केवळ जिहादी दोषी असून त्यांचा निपटारा करण्यासाठी हिंदू राष्ट्र निर्मितीची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले.

ज्याप्रमाणे देशात विकासकामे करण्याकरिता शासनाची जिल्हा विकास यंत्रणा ‘डीडीओ’ कार्यरत असते, त्याचप्रमाणे हिंदूंच्या विकासाकरिता आमची ‘एचडीओ’ हनुमान चालिसा विकास यंत्रणा कार्यरत आहे. यातून गावापासून तर शहरापर्यंत प्रत्येक भागात कार्य करून हिंदूंना समृद्ध करण्याचे काम करीत आहे. देशभरात आतापर्यंत १२ हजार हनुमान चालिसा केंद्र स्थापन केले असून ते कार्यरत आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचे प्रयत्न असल्याचेही डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष मोतीलाल चौधरी, विदर्भ प्रांतमंत्री योगेश गायकवाड, राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांताध्यक्ष अनुप जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :wardha-acवर्धा