शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘राजीव गांधी निवारा-२’ योजना बारगळली

By admin | Updated: June 25, 2014 23:54 IST

राज्य शासनाने गरिब कुटुंबासाठी इंदिरा गांधी घरकूल योजना कार्यान्वित केली आहे. यातून सर्वांना घरकूल मिळणे शक्य नव्हते म्हणून सोबतीला राजीव गांधी निवारा-२ योजना अंमलात आणली़ प्रारंभी

बँकांची मंजुरीला बगल : अडीच वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील प्रकरणे धूळ खातअमोल सोटे - आष्टी (श़)राज्य शासनाने गरिब कुटुंबासाठी इंदिरा गांधी घरकूल योजना कार्यान्वित केली आहे. यातून सर्वांना घरकूल मिळणे शक्य नव्हते म्हणून सोबतीला राजीव गांधी निवारा-२ योजना अंमलात आणली़ प्रारंभी दोन-तीन वर्षे प्रकरणे बँकांमार्फत मंजूर झालीत; पण अडीच वर्षांपासून बँकांनी प्रकरणे मंजूर केली नाहीत़ यामुळे ही योजना बारगळल्याचे दिसून येते़इंदिरा आवास योजना, पंतप्रधान ग्रामोदय योजना, रमाई घरकूल योजना यातून दारिद्र्य रेषेखालील हजारो कुटुंबांना हक्काचे घर मिळाले; पण अल्प उत्पादन घेणाऱ्या नागरिकांना स्वत:चे पक्के घर बांधता येत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने आॅगस्ट २००८ मध्ये सुधारीत राजीव गांधी निवारा २ योजना अंमलात आणली़ या योजनेत बीपीएल, अंत्योदयची अट नसल्याने सर्वसामान्यांसाठी चांगली योजना म्हणून लौकीकप्राप्त ठरली. शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेचे सहकार्य घेतले.प्रत्येक लाभार्थ्यांला बँकेकडून ९० हजार व १० हजार लाभार्थी हिस्सा, कर्जाऊ रूपाने देऊन १० वर्षांत बिनव्याजी परतफेड करायची आहे. कर्जाऊ रकमेवरील व्याज मात्र लाभार्थ्यांना माफ होते. कल्याणकारी योजना असल्याने नागरिकांच्या पसंतीस उतरली होती. यामुळे कागदपत्र गोळा करून ग्रा़पं़ मार्फत पंचायत समितीला व तेथून बँकेत जाण्याचा प्रवास सुलभ झाला होता. हजारो लाभार्थ्यांनी लाभ घेऊन रितसर हप्ता भरणे सुरू केले होते; पण अडीच वर्षांपूर्वी शासनानेच राजीव गांधी निवारा - २ योजना गुंडाळून ठेवली आहे. प्रकरण मंजूर झाले काय, हे जाणून घेण्यासाठी लाभार्थी बँकेच्या चकरा मारतात; पण अधिकारी उत्तर देत नाहीत़ लोकप्रतिनिधी याविरूद्ध आवाज उठवत नाहीत़ राजीव गांधी निवारा-२ या योजनेमधून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेकडो लाभार्थ्यांनी बँकेचे हस्ते अदा केलेत; पण त्यांच्या कर्जावरील व्याज अद्याप शासनाने बँकेला दिले नाही. सदर व्याज लाभार्थ्यांच्या नावावर आजही कायम आहे. शासनाचे अधिकारी चांगल्या योजनांची कशी वाट लावतात, हेच या योजनेतून दिसून येते़ राजीव गांधी निवारा-२ योजनेसाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण ५ हजार ३५४ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ७३५ प्रकरणे मंजूर करण्यात आली होती़ उर्वरित लाभार्थी आजही लाभ मिळेल, अशी भाबडी आशा बाळगून आहेत़ नागरिकांना हक्काचा निवारा बांधून देण्याऐवजी योजनाच बंद करून दिशाभूल केली जात असल्याचे सध्या दिसून येत आहे़ ही योजना दोन वर्षांकरिताच राबविण्यात आल्याची माहितीही पूढे आली आहे़ मग, या योजनेतून आपल्याला घर बांधता येईल, अशी आशा उराशी बाळगून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घर मिळणारच नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ शासनाने लाभार्थ्यांची मोठी यादी लक्षात घेता ही योजना पून्हा सुरू करावी, अशी माणगीही लाभार्थ्यांतून होत आहे़